मंगळवार, २८ फेब्रुवारी, २०१७

देशभक्ती यालाच म्हणतात .....

मोठमोठ्या मॉल्समध्ये जाऊन गडगंज शॉपिंग करणे,
आपल्या रक्तातून पिकवलेल्या भाजीपाल्याला रस्त्यावर
विकणाऱ्या शेतकऱ्याबरोबर घासाघीस करणे,
देशभक्ती यालाच म्हणतात......

अडाणी असलेल्या नेत्यांच्या आगे पीछे करणे
आणि त्यांच्यासाठी जीवपण द्यायला तयार,
जवान हे सीमेवर मरण्यासाठीच तैनात असतात,
दोन चार सैनिक मेले तर काय एवढं दुःख....?
देशभक्ती यालाच म्हणतात......

मुलीची छेडछाड  करताना मुलांची गर्दीतील हर व्यक्ती वाहत्या गंगेत हात धुवून घेतो व माणूसकीचं दर्शन घडवतो
आणि
हेच हात बलात्कारी नराधमांसमोर कुत्र्याच्या शेपटासारखं
गुंडाळून घेतात,
देशभक्ती यालाच म्हणतात......

राजकीय पक्षाला लाखों-करोड़ों रु.ची देणगी देताना कुचराई होत नसते
पण सामाजिक कार्यात दिल्या जाणाऱ्या 100 रु.मागे
हजार वेळेस केलेला विचार असतो,
मंदिरात दान पेटीत आपली श्रद्धा व भक्ती गहाण ठेवतो
पण,भिकाऱ्याला भीक देताना माणुसकी विसरून जातो
देशभक्ती यालाच म्हणतात.....

आतंकवादी भारतावर हमेशा हल्ले करुन नरसंहार घडवून आणतात आणि
आपण त्यांची जीवतोड मदत करतो
उद्योगपत्तीना कर्जमाफी दिली जाते आणि
शेतकऱ्याला कायम कर्जबाजारी व्हाव लागतं,
देशभक्ती यालाच म्हणतात......

सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या पक्षाला निवडून दिले जाते आणि सरकार स्थापनेसाठी पाठिंबासुद्धा,
पण सामाजिक संस्थांना त्यांच्या कार्यात आडकाठी
आणली जाते,
उच्चवर्गीयांना चूटकीसरशी न्याय मिळतो आणि
सामान्य मनुष्याला आयुष्याचे उंबरठे झिजवावे लागतात
देशभक्ती यालाच म्हणतात......

नेत्यांचे प्रकटदिन कायम आठवणीत ठेवतात आणि
महापुरूष्याच्या जयंती पुण्यतिथी तारखेवरून
समाजात गदारोळ माजवतात,
अपना काम बनता भाड मे जाये जनता म्हणत भ्रष्टाचाराला खतपाणी पुरवलं जाते आणि
भ्रष्टाचारविरोधी आंदोलन दडपून टाकले जाते
देशभक्ती याला�

रविवार, १२ फेब्रुवारी, २०१७

........कुटुंब......

कुटुंब....
म्हणजे बुजुर्गांची अनुभवी 'बुनियाद',
म्हणजे युवांच्या उत्साहाची 'छत',
म्हणजे या दोहोंना घट्ट करणारी पालकांची 'इमारत',
म्हणजे चिमुकल्यांचे खुले 'आकाश'......

कुटुंब.....
म्हणजे सुंदर संस्काराची 'खाण',
म्हणजे अनुभवी विचारांचा 'खजिना',
म्हणजे नीतीमूल्यांची 'अमाप संपत्ती',
म्हणजे बऱ्या-वाईटांची 'अदालत'.....

कुटुंब....
म्हणजे मानवी जडणघडणीची 'पाठशाळा',
म्हणजे भावनिक गुंतागुंतीची 'सुलझन',
म्हणजे नात्यांबद्दलचा 'आदर',
म्हणजे खुलेपणाने व्यक्त होण्यासाठीचे 'व्यासपीठ'.....

कुटुंब.....
म्हणजे वाद-विवादांचा 'ठोस निकाल',
म्हणजे पुरोगामी विचारांची 'आवक',
म्हणजे गुणावत्तेला उपलब्ध 'पाठबळ',
म्हणजे भावनिक 'आधार'.....

कुटुंब.....
म्हणजे विनोदांचा हास्यकल्लोळ,
म्हणजे एकमेकांची खेचाखेची,
म्हणजे पाहूण्यांचे यथोचित आदर-सत्कार,
म्हणजे मानवी जीवनातील बंदिशाळा.....

कुटुंब......
म्हणजे सण-उत्सवांचे उल्हासाने स्वागत,
म्हणजे एकत्रित साजरायचा आनंद,
म्हणजे त्या दिवशी बनवलेली 'पूरणपोळी',
म्हणजे एकत्रित जेवताना केलेल्या 'दिलखुलास गप्पा'......

कुटुंब.....
म्हणजे सामूहिक आरती,
म्हणजे भक्तीमय भारावलेले वातावरण,
म्हणजे ज्ञानेश्वरी,गीता इ.ग्रंथांचे पारायण,
म्हणजे ग्रंथातील श्लोकांचा उलगडा......

कुटुंब.....
म्हणजे नवजात शिशूंचा जन्मसोहळा,
म्हणजे साक्षात लक्ष्मीचे घरात दमदार स्वागत,
म्हणजे आजींचे शिशूंना 'तेल मालीश',
म्हणजे शिशूंच्या कसदार,पिळदार शरीरांचा 'अखाडा'.....

कुटुंब.....
म्हणजे आजीच्या बटव्याची उत्सुकता,
म्हणजे आजीने सांजेला संगीतलेल्या शुरवीरांच्या गोष्टी,
म्हणजे आजोबांचे विचारात टाकणारे कोडी,
म्हणजे मनुष्याची लहानपणीची जडणघडण......

कुटुंब.....
म्हणजे आई-काकुंचा मिलाफ,
म्हणजे सासूबाईंचे प्रेमळ टोचक शब्द,
म्हणजे सासूबाईंचे आई-काकूवरील प्रेम,
म्हणजे माय-लेकरांचे अनोखे बंधन.......

कुटुंब.....
म्हणजे आई-बाबांची अखंड धडपड,
म्हणजे आजी-आजोबांचा वटवृक्षासारखा आशीर्वाद,
म्हणजे काका-काकुंचे खंबीर पाठबळ,
म्हणजे बच्चे कंपनीचे उज्ज्वल भविष्य.....

कुटुंब....आज
म्हणजे मतभेदाचे व्यासपीठ,
म्हणजे डोईजड होणारे रिश्ते-नाते,
म्हणजे अवघड जागचं दुखणं,
म्हणजे भावनिक अत्याचार.....

कुटुंब....आज
म्हणजे बुजुर्गांचे अनाहूत सल्ले,
म्हणजे विनाकारणाच्या जबाबदाऱ्या,
म्हणजे पुराणी जीवनशैली,
म्हणजे संस्कारी विचारांची विल्हेवाट......

कुटुंब....आज
म्हणजे 'हम दो,हमारे दो' संकल्पना,
म्हणजे 'छोटा परिवार,सुखी परिवार' विचारधारणा,
म्हणजे 'फोडा आणि राज्य करा' कूटनीति,
म्हणजे 'पैसाच सर्वोपरि' मानसिकता......

कुटुंब....आज
म्हणजे आई-बाबांचे ओझे,
म्हणजे नात्यांची फरफट,
म्हणजे छिन्नविच्छिन्न होणारी मन,
म्हणजे डबघाईला आलेली पारंपरिक संस्था.....

   
                                 ....माही उर्फ महेश....

शनिवार, ११ फेब्रुवारी, २०१७

माझ्या विद्यार्थ्याने रचलेली कविता..

अंदमान येथे भारतीय नौसेनेत कार्यरत आहे.

नाव- महेश धनराज बिराजदार 

या जगाला कळलं पाहिजे.....

अरे गड्या,तुझ्यात काय आहे
या जगाला कळलं पाहिजे......

तुझ्यात असणारी बुद्धिमत्ता,कौशल्य,
तुझ्यात असणारी विचारशैली,साहस,
तुझ्यात असणारी 'अंधरूनी शक्ती',
तुझ्यात असणारा आत्मविश्वास,
अरे गड्या,तुझ्यात काय आहे
या जगाला कळलं पाहिजे......

तुझ्यात आहे संभाजीराजेंचा पंजा
संकटांचा जबडा उघडून दात पाडायला,
तुझ्यात आहे 'ढाई किलो का हाथ'
शत्रुंचा चकनाचूर करायला,
अरे गड्या,तुझ्यात काय आहे
या जगाला कळलं पाहिजे......

तुझ्यात आहे वज्रमुठ
संकटांचा माउंट एवरेस्ट फोडायला,
तुझ्यात आहे 'पोलादी' 'भरभक्कम' पाऊल
जिथं लाथ मारील तिथं पाणी काढायला,
अरे गडया,तुझ्यात काय आहे 
या जगाला कळलं पाहिजे......

तुझ्यात आहे एक निरागस,गोंडस मुलगा
आईचा,
तुझ्यात आहे एक कर्तव्यदक्ष,आज्ञाधारक बेटा
बाबांचा,
तुझ्यात आहे एक फौजी भाऊ सीमेवर लढणारा
बहिणीचा,
तुझ्यात आहे एक गुणवान विद्यार्थी
शिक्षकांचा,
अरे गड्या,तुझ्यात काय आहे
या जगाला कळलं पाहिजे......

तुझ्यात आहे ती ज्योत,क्रांती घडवून आणण्याची,
तुझ्यात आहे ती लढाऊ वृत्ती,समाजातील अनिष्ठ
रुढी-परंपरांच्या विरोधात लढण्याची,
तुझ्यात आहे तो युवाशक्तीचा गुरगुरणारा आवाज,
समाजातील बुरसटलेल्या विचारांना हादरवुन,
उखडून फेकायला,
अरे गड्या,तुझ्यात काय आहे
या जगाला कळलं पाहिजे.....

तुझ्यात आहेत पुढारलेले विचार,
तुझ्यात आहेत नवीन संकल्पना,
तुझ्यात आहेत नाविन्यपूर्ण उपक्रम,
तुझ्यात आहेत असंख्य नवविचारांनी भरलेलं गोदाम,
अरे गड्या,तुझ्यात काय आहे
या जगाला कळलं पाहिजे.....

तुझ्याकडे आहे संस्कृतीचा अमूल्य ठेवा,
तुझ्यात आहे तो प्रयत्न अमूल्य ठेवा जपण्याचा,
तुझ्याकडे आहे महापुरुषांच्या पराक्रमाचा वारसा,
तुझ्यात आहे ती धडपड या पराक्रमाला follow करण्याची,
अरे गड्या,तुझ्यात काय आहे
या जगाला कळलं पाहिजे......

तुझ्याकडे आहे क्रांतिकारी विचारांचा खजिना,
तुझ्यात आहे ती इच्छा या विचारातून नवसमाज घडवण्याचा,
तुझ्याकडे आहे नावजलेल्या लेखकांच्या ग्रंथाची 'मांदियाळी'
तुझ्यात आहे ती धडपड वाचक वर्गात उत्साह जागवण्याचा,
वाचन चळवळ टिकवण्याचा,
अरे गड्या,तुझ्यात काय आहे
या जगाला कळलं पाहिजे......

तुझ्यात आहे इच्छा समाजात स्त्री-पुरुष समानता प्रस्थापित करण्याची,स्त्रियांना सन्मान मिळवून देण्याचा,
तुझ्यात आहे ती प्रेरणा,युवक वर्गाला त्यांच्या मेलेल्या 
दिलात नवचेतना जागवण्याचा,
तुझ्यात आहे शिक्षणाबद्दलचा आधुनिक दृष्टिकोन,
अरे गड्या,तुझ्यात काय आहे
या जगाला कळलं पाहिजे......

तुझ्यात आहे एक आदर्शवादी मुलगा,
वृद्धपकाळात आई-बाबांची सेवा करणारा,
तुझ्यात आहे एक कर्तृत्ववान फौजी भाऊ,पती
कर्तव्य बजावत असताना सुद्धा विचारपूस करणारा,
अरे गड्या,तुझ्यात काय आहे
या जगाला कळलं पाहिजे.....

तुझ्यात आहे एक संस्कारशील पिता,आजोबा
आपल्या पाल्यांना संस्कारबरोबरच जगण्यातील संकटांना
खंबीरपणे लढायला शिकवणारा,
तुझ्यात आहे एक आज्ञाधारक विद्यार्थी,
आपल्या कर्तृत्वाने समाजाला बदलवणारा,
अरे गड्या,तुझ्यात काय आहे
या जगाला कळलं पाहिजे......

तुझ्यात आहे भारताचे उद्याचे भविष्य,
तुझ्यात आहे भारताचे उभरते नेतृत्व,
तुझ्यात आहे golden boy अभिनव बिंद्रा,
तुझ्यात आहे उद्योगपती रतन टाटा,अंबानी,
अरे गड्या,तुझ्यात काय आहे 
या जगाला कळलं पाहिजे......

तुझ्यात आहेत ते विचार आणि कर्म,
जातिभेदविरहित समाज निर्माण करण्याचे,
तुझ्यात आहे तो सुज्ञपणा,समंजसपणा,
माणसाला माणूस म्हणून मानुसकीने जगवण्याचा,
अरे गड्या,तुझ्यात काय आहे
या जगाला कळलं पाहिजे......

                                          --माही उर्फ महेश

मंगळवार, ७ फेब्रुवारी, २०१७

 -वसंत काळपांडे (माजी शिक्षण संचालक)
(महाराष्ट्र टाइम्स, दिनांक 29 जानेवारी, 2017)
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••
🗞गेल्या दोन वर्षांत महाराष्ट्र शासनाने शालेय शिक्षणक्षेत्र मुळापासून ढवळून निघेल, असे अनेक निर्णय घेतले. एसएससीची परीक्षा पुन्हा घेण्याच्या निर्णयामुळे अनेक विद्यार्थ्यांचे एक शैक्षणिक वर्ष वाचले. दुसरी भाषा किंवा सामाजिक शास्त्र या विषयांना पर्याय म्हणून नववी दहावीला व्यवसाय शिक्षणाचे अभ्यासक्रम घेण्याची सोय उपलब्ध करून दिली हासुद्धा अतिशय चांगला निर्णय आहे. या वर्षी नव्याने प्रकाशित झालेली इयत्ता सहावीची पाठ्यपुस्तके अंतर्बाह्य सुंदर होती. शाळा सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी ही आकर्षक आणि दर्जेदार पुस्तके विद्यार्थ्यांच्या हातात पडल्यामुळे विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्यात समाधानाचे वातावरण होते.
ई-लर्निंग, डिजिटल शाळा आणि तंत्रस्नेही शिक्षक यांच्या चळवळीने या तीन वर्षांत चांगलाच जोर पकडला आहे. गेल्या दोन वर्षांत उच्चभ्रू शाळांची मक्तेदारी मोडून हजारो जिल्हा परिषद शाळा आयएसओ झाल्या. पहिलीपासून इंग्रजी, सेमी-इंग्रजी, बदललेले आकर्षक बहिरंग यामुळे विद्यार्थी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधून जिल्हा परिषद शाळांकडे परत यायला लागले. व्यावसायिक विकासाच्या बाबतीत शिक्षक खूपच जागरूक झाले. विविध शैक्षणिक कार्यक्रमांना स्वेच्छेने, स्वखर्चाने, रजा घेऊन हजेरी लावायला लागले. वृत्तपत्रे, शैक्षणिक नियतकालिके आणि इतरत्र लिहायला लागले. स्वत:ची पुस्तके प्रकाशित करायला लागले. शैक्षणिक प्रकल्प हाती घ्यायला लागले. तंत्रज्ञानाचा वापर स्वत:च्या विद्यार्थ्यांना शिकवताना आणि स्वत:च्या व्यावसायिक विकासासाठी वाढत्या प्रमाणावर करायला लागले. शिक्षकांचे शैक्षणिक विचारांच्या देवाण घेवाणीसाठी शेकडो व्हाट्सअॅप समूह आणि फेसबुक समूह स्थापन झाले. थोडक्यात शैक्षणिक प्रगतीसाठी अतिशय पोषक वातावरण निर्माण झाले आहे; तरीही एक अस्वस्थता आहे, खदखद आहे. ‘आहे मनोहर तरी ...’ असे का व्हावे?
निर्णय घ्यायचे, त्यांना विरोध झाला की, विरोध करणाऱ्यांवर आगपाखड करायची आणि नंतर ते स्वत:हूनच मागे घ्यायचे किंवा त्यांची अंमलबजावणीच करायची नाही हा प्रकार शासनाच्या स्तरावर वारंवार घडायला लागला आहे. सेल्फीचा निर्णय, मोफत पाठ्यपुस्तके विद्यार्थ्यांपर्यंत न पोहोचवता रक्कम थेट त्यांच्या खात्यावर जमा करणे हे निर्णय याची ताजी उदाहरणे आहेत. २० पेक्षा कमी पट असलेल्या शाळा बंद करून या विद्यार्थ्यांची इतर शाळांमध्ये व्यवस्था करायची हा दुसरा असाच एक अव्यवहार्य निर्णय. एकीकडे शाळाबाह्य मुलांच्या शिक्षणाबद्दल चिंता व्यक्त करायची आणि दुसरीकडे दुर्गम भागातील शिक्षणाच्या असलेल्या सोयी नष्ट करायच्या या प्रकाराला काय म्हणायचे? या निर्णयाची सुदैवाने अंमलबजावणी झाली नाही.परंतु शासनाने तो रद्द केल्याचेही जाहीर केले नाही.
*🔹काही वर्षांपूर्वी ज्ञानरचनावादाचा बराच बोलबाला होता.‘कुमठे बीट'मधील शाळांमध्ये वापरली जाते ती पद्धत म्हणजे ज्ञानरचनावाद. अशीच ज्ञानरचनावादाची व्याख्या करण्यात आली होती.*कुमठे मॉडेलप्रमाणे ज्ञानरचनावादी तक्ते, पुस्तके आणि इतर साहित्य शाळाशाळांमध्ये विकत घेतले गेले. *‘ज्ञानरचनावादी फरशा’* रंगवून घेण्यात आल्या. परंतु आजही आपण ज्ञानरचनावादी पद्धतीनेच शिकवतो, असे आत्मविश्वासाने सांगणारे शिक्षक दुर्मिळच आहेत. *‘मेंदूआधारित शिक्षण’*ही सध्या चलनात असलेली आणखी एक संकल्पना. ज्यांनी एकाही हॉस्पिटलमधील मेंदूची प्रयोगशाळा पाहिलेली नाही, माणसाचा मेंदू पाहिलेला नाही, ज्यांचा शरीरशास्त्राचा मुळीच अभ्यास नाही, ते या क्षेत्रात तज्ज्ञ म्हणून वावरतात यापेक्षा आणखी दुर्दैव काय असू शकेल?
*🔸नुकतीच सिंगापूरला शिक्षकांची एक शैक्षणिक सहल जाऊन आली. राज्य शासन ज्ञानरचनावादाचा पुरस्कार करत असताना रचनावादाचे विरुद्ध टोक असलेली शिक्षणपद्धती ज्या देशात वापरली जाते, अशा देशाला शैक्षणिक सहल कशासाठी? या भेटीच्या वेळी सिंगापूरमधील शाळा बंद होत्या. मग तिला ‘शैक्षणिक सहल’ तरी कसे म्हणता येईल? गंमत अशी की, आज या सहलीत सहभागी झालेले शिक्षक राज्यभर फिरून इतर शिक्षकांना सिंगापूरची शिक्षणपद्धती अधिकारवाणीने समजावून देत आहेत!*
गेल्या वर्षी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाबद्दलचा शासन निर्णय निघाला. थोड्याच दिवसांनी शासनाच्या शालेय शिक्षण विभागाच्या सचिवांनी महाराष्ट्र तेराव्या क्रमांकावरून तिसऱ्या क्रमांकांकावर गेल्याचे जाहीर केले. हे कशाच्या आधारे जाहीर केले ते मात्र गुलदस्त्यात ठेवले. मधल्या काळात सर्व शाळांमध्ये पायाभूत चाचण्या झाल्या. परंतु त्यांच्या निकालांबद्दलही कोणतीच माहिती उपलब्ध नाही. या महिन्याच्या 
जलद शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमा’बद्दलचा शासन निर्णयात एक मोठेच ‘घुमजाव’ आहे. तिसऱ्या क्रमांकावर पोहोचलेल्या महाराष्ट्रात ५० टक्के प्राथमिक शाळा अप्रगत असल्याचे लक्षात आले. आता ३१ मार्च २०१७पर्यंत उरलेल्या सर्व शाळा प्रगत करण्याचे लक्ष्य आहे. न्यूपाच्या डाइस अहवालानुसार महाराष्ट्र तेराव्या क्रमांकावर आहे; तर असरच्या अहवालानुसार २०१०पासून सुरू झालेली महाराष्ट्राची घसरण इतर राज्यांच्या तुलनेत आजही सर्व बाबतीत सुरूच आहे.
🔹डिजिटल शाळा आणि तंत्रस्नेही शिक्षक जलद प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. हजारो शाळा डिजिटल, तर शिक्षक तंत्रस्नेही म्हणून नोंदले गेले आहेत. प्रत्यक्षात केवळ शिक्षकांचा स्मार्टफोन आणि मॅग्निफायिंग ग्लास एवढेच साहित्य असलेल्या अनेक शाळांनी डिजिटल म्हणून नोंदणी केली आहे. तोच प्रकार तंत्रस्नेही शिक्षकांचा. हे सर्व करताना केंद्र सरकारचे National Policy on ICT in Schools नावाचे धोरण अस्तित्वात आहे आणि त्याचा वापर केला पाहिजे; पाठ्यपुस्तके, अध्ययन-अध्यापन प्रक्रिया आणि मूल्यमापन यांची ई-लर्निंगशी सांगड घालायला पाहिजे; यासाठी लागणारे साहित्य कसे तयार करायचे आणि कसे निवडायचे याबाबत शिक्षक मार्गदर्शिका तयार व्हायला पाहिजे, त्यांचे प्रशिक्षण व्हायला पाहिजे या गोष्टींची कोणाला जाणीव आहे, असे मुळीच दिसत नाही. शैक्षणिक तंत्रज्ञानाबद्दल मार्गदर्शन करणाऱ्या महाराष्ट प्राथमिक शिक्षण परिषदेच्या संकेतस्थळावर आजही २०११-१२ नंतरची माहिती उपलब्ध नाही ही आणखी एक धक्कादायक बाब. राज्यात सुरू असलेल्या विविध शिक्षक-प्रशिक्षणात अध्ययनाला, अध्यापनाला अतिशय दुय्यम स्थान दिलेले आहे.
🔸पूर्वी शासनाच्या इतर विभागांच्या शिक्षणेतर कामांबद्दल शिक्षकांची तक्रार असायची. आता ती शिक्षण विभागाच्याच शिक्षणेतर कामांबद्दल सुरू झाली आहे. ‘शालार्थ’मध्ये ऑनलाईन बिले पाठवण्याबरोबरच पारंपरिक पद्धतीनेसुद्धा बिले भरून समक्ष द्यावी लागतात. ‘सरल’चे काम प्रचंड, पण अजूनही यु-डाइस आणि इतर माहिती वेळोवेळी पाठवावीच लागते. दुर्गम भागात रेंज नसते. अनेक शाळांमध्ये वीजबिले थकल्यामुळे वीज तोडलेली आहे. शाळांना वीज सवलतीच्या दरात पुरवण्याबाबत शासनाने अजूनही निर्णय घेतलेला नाही. खूप कमी शिक्षकांना ऑनलाइन माहिती भरता येते. त्यांना पैसे भरून सायबर कॅफेची किंवा परिसरातल्या जाणकार शिक्षकांची मदत घ्यावी लागते. लोकसहभागातून पैसा मिळवायला मर्यादा असतात हे शासन लक्षात घेत नाही अशीही शिक्षकांची तक्रार आहे. शिक्षण हक्क कायद्याच्या आधारे बदललेल्या शिक्षक पदांचे निकष विद्यार्थ्यांवर अन्यायकारक आहेत. गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी आणि केंद्र प्रमुख यांचे सेवाप्रवेश नियम तयार असूनही नेमणुका न झाल्यामुळे निम्म्यापेक्षा जास्त पदे रिकामी आहेत. जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना गेल्या दोन वर्षांपासून सादिलखर्च, शाळा अनुदान, शिक्षक अनुदान आणि देखभाल व दुरुस्ती यासाठीचे अनुदान; तर अनुदानित शाळांना वेतनेतर अनुदानाची रक्कम मिळत नसल्याची तक्रार आहे. त्यामुळे आज अनेक अनुदानित शाळा नियमात नसूनही विद्यार्थ्यांकडून वेगेवेगळ्या स्वरुपात रकमा आकारत असतात.
संस्थात्मक रचना मोडकळीला आल्या आहेत. शालेय शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी शाळांचे पर्यवेक्षण करणे आणि तांत्रिक आणि धोरणविषयक बाबतीत सल्ला द्यायचा असतो; सनदी अधिकाऱ्यांनी मंत्रालय आणि विधिमंडळ या पातळ्यांवरील बाबी आणि शासन निर्णय आणि अधिनियम यांच्याशी सबंधित बाबी सांभाळायच्या असतात आणि धोरणांच्या अंमलबजावणीचे नियंत्रण करायचे असते. लोकभावना, आपल्या पक्षाचा निवडणूक जाहीरनामा आणि पक्षाची धोरणे विचारात घेऊन संविधानाच्या चौकटीत मंत्र्यांनी निर्णय घ्यायचे असतात. आज सनदी अधिकाऱ्यांनी सर्वच क्षेत्रांवर अतिक्रमण केल्यामुळे समतोल ढळला आहे. राज्यपातळीपासून खालपर्यंत संवाद तुटलेला आहे. क्षेत्रीय पातळीवरील अधिकाऱ्यांचे नीतिधैर्य खच्ची झाले आहे. हे शिक्षणक्षेत्राला आणि विशेषतः विद्यार्थिहिताच्या दृष्टीने अतिशय घातक आहे.
हे सर्व चुकते आहे हे लक्षात घेऊन शिक्षणमंत्र्यांनी पुढाकार घेऊन मंत्रालयापासून खालपर्यंत तुटलेला संवाद पुन्हा मनापासून आणि पारदर्शकपणे सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला, अस्तित्वात असलेल्या संस्था सक्षम केल्या तर चांगले दिवस परतायला वेळ लागणार नाही.
वसंत काळपांडे 
वाचता नाही अंगावर काटा उभा रहावा अशी ही कविता...  खुप खुप छान लिहिलीय...
.
.❣❣❣❣❣
 शप्पत नक्की वाचा.
💝💘💝💘💝💘💝
"साद आईची"
.
.🌸🌸🌸🌸🌸🌸🌸

महिनेमागून महिने,
शेवटी वर्ष सरुन जाते
वृध्दाश्रमाच्या पायरीवर ,
वाट तुझी पाहाते
.
.🏵🏵🏵🏵🏵

भिजून जातो पदर ,
अन मन रिते राहाते
कधी मधी मात्र ,
तुझी मनीऑर्डर येते
.
.⚜⚜⚜⚜⚜⚜

पैसे नकोत यावेळी ,
तूच येऊन जा
बाळा मला तुझ्या ,
घरी घेऊन जा
.
.☯☯☯☯☯☯

तुझा बा होता तोवर ,
काळ बरा गेला
तुझी आठवण काढत ,
उघड्या डोळ्यांनी गेला
.💟💟💟💟💟💟💟
.
शेवटपर्यंत सांगत होता,
 लेक माझा भला
तू मोठा साहेब,
त्याचं मोठं कौतुक त्याला
.
.💝💝💝💝💝💝💝
माझ्याही ह्रदयात फोटो,
 तुझा तू पाहून जा
बाळा मला तुझ्या ,
घरी घेऊन जा.
.
.💘💘💘💘💘💘
दुष्काळाच्या साली ,
जन्म तुझा झाला
तुझ्या दुधासाठी ,
आम्ही चहा सोडून दिला
.
.💖💖💖💖💖💖
वर्षाकाठी एक कपडा,
 पुरवून-पुरवून घातला
सालं घातली बापाने,
पण तुला शाळेमधी घातला..
.
.💗💗💗💗💗💗

हवं तर तू हे ,
सगळं विसरुन जा
पण बाळा मला ,
तुझ्या घरी घेऊन जा.
.
.💓💓💓💓💓💓💓
धुणी-भांडी करीन मी,
केरकचरा भरीन मी
पुरणपोळ्या, अळुवड्या ,
तुझ्यासाठी रांधीन मी
.
.💞💞💞💞💞💞

नातवंडांचं दुखलं-खुपलं ,
सगळं बघेन मी
घाबरु नकोस, त्याची आजी ,
असं नाही सांगणार नाही मी
.💕💕💕💕💕💕
.
तुझ्या घरची कामवाली ,
म्हणून घेऊन जा
पण बाळा मला
तुझ्या घरी घेऊन जा.
.
.❣❣❣❣❣❣
थकले रे डोळे बाळा,
प्राण कंठी आले
तुझ्याविना जगणे
आता मुश्किल झाले
.
.💜💜💜💜💜💜💜

विसरु कशी तुला मी,
तुझ्यामुुळे आई झाले
बाळ माझं 'कुलभूषण'
पोरकी मी का झाले?
.
.💚💚💚💚💚💚💚

आता माझ्या थडग्यापाशी
'आई' म्हणून जा
जमलंच तुला तर
हा वृध्दाश्रम पाडून जा.

💛💛💛💛💛💛💛.
.
हा मेसेज खुप  जणाना पाढवा तुमच्या सगळ्या ईच्छा पुर्ण होतील ...
.
❤❤❤❤❤❤❤
.
आईवर प्रेम करत असाल तर नक्की शेअर करा...
💖💖💖💖💖💖💖

सोमवार, ६ फेब्रुवारी, २०१७

*संपूर्ण आयुर्वेद लिहिलंय शॉर्ट मध्ये,*
हे वाचल्यावर अक्षरशः काही वाचायची गरज नाही!
वाचा आणि पालन करा.

|| शरीराला आवश्यक खनिजं ||

*🔺कॅल्शिअम*
कशात असतं?
शेंगदाणे, तीळ, दूध, खोबरं, मुळा, कोबी. ज्वारी, राजगिरा, खरबूज, खजूर
कमतरतेमुळे काय होतं?
हृदयरोग, ऑस्टियोपोरोसिस, दंतरोग, केस गळणे
कार्य काय असतं?
शरीरातील सर्वात मुख्य खनिजं असून ते हाडांची मजबुती आणि शरीराच्या निर्मितीसाठी आवश्यक असतं.
🌺🌺🌺े

*🔺लोह*
कशात असतं?
खजूर, अंजीर, मनुका, सफरचंद, डाळिंब, पालक, सीताफळ, उस, बोर, मध, पपई आणि मेथी
कमतरतेमुळे काय होतं?
शरीरात रक्ताची कमतरता भासते. अशक्तपणा, कावीळ किंवा पोटात मुरडा येतो.
कार्य काय असतं?
शरीराच्या वाढीसाठी अतिशय आवश्यक असतं.
🌺🌺🌺े

*🔺सोडिअम*
कशात असतं?
मीठ, पाणी, बटाटा, आलं, लसूण, कांदा, मिरची, पालक, सफरचंद, कारलं
कमतरतेमुळे काय होतं?
रक्तदाबाशी निगडित समस्या, निद्रानाश, अंगदुखी, अपचन, मूळव्याधीसारखे आजार, मोतीबिंदू, बहिरेपणा, हात अणि पाय कडक होणे.
कार्य काय असतं?
शरीराला आवश्यक असणारी पाचक रसायनाची निर्मिती करतात, त्याचप्रमाणे शरीरात होणारा गॅस नष्ट होतो.
🌺🌺🌺े

*🔺आयोडिन*
कशात असतं?
शिंघाडा, काकडी, कोबी, राजगिरा, शतावरी, मीठ आणि लसूण.
कमतरतेमुळे काय होतं?
थायरॉइडची समस्या, केस गळणे, डिप्रेशन किंवा बैचेनी येणे.
कार्य काय असतं?
शरीरात उत्पन्न होणाऱ्या विषारी पदार्थापासून मेंदूला बचावण्याचं काम करतो.
🌺🌺🌺े

*🔺पोटॅशिअम*
कशात असतं?
सर्व प्रकारची धान्य, डाळ, संत्र, अननस, केळं, बटाटा, लिंबू, बदाम.
कमतरतेमुळे काय होतं?
अ‍ॅसिडिटी, त्वचेवर सुरकुत्या किंवा मुरुमं येणं, त्वचा रोग, केस पिकणे.
कार्य काय असतं?
शरीरात तंतू आणि यकृत यांना सुरळत ठेवण्याचं कार्य करतं.
🌺🌺🌺े

*🔺फॉस्फरस*
कशात असतं?
दूध, पनीर, डाळी, कांदा, टोमॅटो, गाजर, जांभळं, पेरू, काजू, बदाम, बाजरी आणि चणे.
कमतरतेमुळे काय होतं?
ऑस्टिओपोरोसिस, गतिमंद होणे, मानसिक थकवा, दंत रोग.
कार्य काय असतं?
मेंदूला ताजंतवानं ठेवण्याचं काम हे खनिजं करतं.
🌺🌺🌺े

*🔺सिलिकॉन*
कशात असतं?
गहू, पालक, तांदूळ, कोबी, काकडी, मध,
कमतरतेमुळे काय होतं?
कॅन्सर, त्वचारोग, बहिरेपणा, केस गळणे.
कार्य काय असतं?
जननेंद्रियांची कार्यक्षमता वाढवून शरीरातील तंतूना मजबूत करतात.
🌺🌺🌺े

*🔺मॅग्नेशिअम*
कशात असतं?
बाजरी, बीट, खजूर, सोयाबीन, दूध, लीची, कारलं.
कमतरतेमुळे काय होतं?
उदास होणे, आळस येणे, तणाव असणे, झोप न लागणे, बैचेनी, सोरायसिस, फोडं, नपुंसकता किंवा वांझपणा.
कार्य काय असतं?
पेशीचं कार्य सुधारतं. रेचक म्हणून काम करतं.
🌺🌺🌺े

🔺सल्फर
कशात असतं?
दूध, पनीर, डाळ, टोमॅटो, बटाटा, आलं, मिरची, सफरचंद, अननस, सुरण.
कमतरतेमुळे काय होतं?
प्रतीकारशक्ती कमी होते, केस गळतात, वजन वाढतं, मधुमेहाला आमंत्रण मिळतं.
कार्य काय असतं?
इन्सुलिनचं रेचन म्हणून कार्य करतं.
🌺🌺🌺े

*🔺क्लोरिन*
कशात असतं?
पानी, बीट, कोबी, मीठ, दूध, लिंबू, आवळा, मध.
कमतरतेमुळे काय होतं?
अ‍ॅसिडिटी, अल्सर, कॅन्सर, आणि अ‍ॅलर्जी.
कार्य काय असतं?
सोडिअम आणि पोटॅशिअमला पाचक बनवण्यासाठी सहायता करतं, त्याचप्रमाणे शरीरातील आम्लक्षाराचं संतुलन राखलं जातं.
🌺🌺🌺े

*🔺खाद्यपदार्थामधील खनिजं शरीराला मिळावीत म्हणून काय केलं पाहिजे.🔺*
» फळं किंवा भाज्या कापल्यानंतर कधीच धुवू नयेत. असं केल्याने त्यातील खनिजं पाण्यावाटे नष्ट होतात.
» डाळ, तांदूळ किंवा धान्यदेखील उकडण्यापूर्वीच स्वच्छ धुऊन घ्यावेत.
» काही धान्य, फळं तसंच भाज्यांच्या सालींमध्ये खनिजांचा मोठा प्रमाणावर साठा असतो. त्यामुळे अशा सालींचा आहारात समावेश करावा.
» दुधात खनिजांचा भरपूर स्रेत असतो म्हणूनच दूध जास्त प्रमाणात उकळू नये. दूध जास्त प्रमाणात उकळल्याने त्यातील खनिजं नष्ट होतात.
» फळं कापून खाण्याऐवजी शक्यतो आहे तशीच खावीत. उदाहरणार्थ, चिकू किंवा सफरचंद ही फळं संपूर्ण खावीत.
🌺🌺🌺े

*▫ब्लड प्रेशर  आणि  नियंत्रण▫*
*============================*

ब्लडप्रेशर असलेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. धकाधकीच्या जीवनात फास्ट फूड आणि अनियमित दिनचर्या या कारणामुळे या आजाराचे रुग्ण भारतातही मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. ब्लडप्रेशरमुळे हृदयाचे आजार, स्ट्रोक अशा समस्या निर्माण होण्याची दाट शक्यता असते. ब्लडप्रेशरच्या रुग्णाला दररोज औषध घ्यावे लागते. आज  तुम्हाला काही घरगुती उपायांची माहिती देत आहोत. तुम्हालाही ब्लडप्रेशरचा त्रास असेल तुम्ही हे घरुगुती उपाय अवश्य करून पाहा. या उपायांनी तुमचे ब्लडप्रेशर नियंत्रणात राहील.
🌺🌺🌺े

*▫लसूण -*

ब्लडप्रेशरच्या रुग्णांसाठी लसूण अमृतासमान औषधी आहे. यामध्ये एलिसीन नावाचे तत्त्व असते, जे नायट्रिक ऑक्साइडचे प्रमाण वाढवते आणि यामुळे आपल्या मासपेशींना आराम मिळतो. ब्लडप्रेशरच्या डायलॉस्टिक आणि सिस्टॉलिक कार्यप्रणालीला आराम मिळतो. यामुळे ब्लडप्रेशरच्या रुग्णांनी दररोज लसणाची एक पाकळी अवश्य खावी.
🌺🌺🌺े

*▫शेवगा -*

यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आणि व्हिटॅमिन तसेच खनिज लवण आढळून येतात. एका संशोधनानुसार, या झाडाच्या पानांचा अर्क पिल्यास ब्लडप्रेशरच्या डायलॉस्टिक आणि सिस्टॉलिक कार्यप्रणालीवर सकारत्मक प्रबाव पडतो. ब्लडप्रेशरच्या रुग्णाने मसूरच्या डाळीसोबत शेवग्याचे सेवन करावे.
🌺🌺🌺े

*▫जवस -*

जवसामध्ये अल्फा लिनोनेलिक अ‍ॅसिड भरपूर प्रमणात असते. हे एक प्रकारचे महत्त्वपूर्ण ओमेगा-३ फॅटी अ‍ॅसिड आहे. विविध संशोधनामध्ये समोर आले आहे, की ज्या लोकांना हायपरटेन्शनची समस्या असेल त्यांनी जेवणात जवसाचा उपयोग अवश्य करावा. यामुळे कॉलेस्टेरॉलची मात्रा कमी होते आणि याच्या सेवनाने ब्लडप्रेशर नियंत्रणात राहते.
🌺🌺🌺े

*▫विलायची -*

एका संशोधनानुसार विलायचीचे नियमित सेवन केल्यास ब्लडप्रेशर व्यवस्थित राहते. याच्या सेवनाने शर
हळद   Turmeric
🌺🌺🌺े

*गुणधर्म  -----*

तिखट,  कडवट,  रूक्ष,  गरम,  जंतुनाशक,  रक्तशुद्धीकारक,  वात,  पित्त,  कफ  शमन  करणारी.

*उपयोग -----*

*१)*  जखमेवर  किंवा  मुका  मार  लागणे.  हळद  लावा.
*२)*  रक्ती  मुळव्याध  -  बकरीचे  दूध  +  हळद  घ्या.
*३)*  सर्दी,  कफ,  खोकला -  गरम  दूध  +  तूप  +  हळद  घ्या.
*४)*  जास्त  लघवी  -  पांढरे  तीळ  +  गुळ  +  हळद  घ्या.
*५)*  आवाज़  बसणे  -  हळद  +  गुळ  गोळ्या  करून  खा.
*६)*  काविळ  -  ताक  +  हळद.
*७)*  ताप  -  गरम  दूध  +  हळद  +  काळीमिरी  पुड.
*८)*  लघवितून  पू  जाणे  -  आवळा  रस  +  हळद  +  मध.
*९)*  मुतखडा  ( स्टोन )  -   ताक  +  हळद  +  जूना  गुळ.
🌺🌺🌺े

      #    *आरोग्य   संदेश*    #
   
हळदच  आहे  जंतुनाशक, रक्तशुद्धीकारक,
नक्कीच   आजारांना    आहे   ती   मारक.
 
*तोंडाचे  विकार*
 
*कारणे -----*

जागरण  करणे,  जास्त  तिखट  खाणे,  पोट  साफ  नसणे,  पित्त  होणे,  अपचन  होणे,  उष्णता  वाढणे,  रोगप्रतिकारक  शक्ति  कमी  होणे. व्यसन  करणे.

*उपाय -----*

*१)*  जेवणात  गाईचे  तूप  व  ताक  घ्या.
*२)*  गुलकंद  खा.
*३)* ज्येष्ठमधाची  कांडी  चघळावी.
*४)*  दुधाची  साय  आणि  शंखजीरे  मिक्स  करून  तोंडातून  लावा.
*५)*  हलका  आहार  घ्या.
*६)*  वरील  कारणे  कमी  करा. त्रिफळा  चूर्ण  घेऊन  पोट  साफ  ठेवा.
*७)*  दही  उष्ण  असल्याने  जास्त  खाऊ  नका.
*८)*  जाईची  पाने  किंवा  तोंडलीची  पाने  किंवा  पेरूची  पाने  किंवा  उंबराची  कोवळी  कांडी  चावून  थुंका.
*९)*  नियमित  प्राणायाम  करा.
*१०)*  आवळा  पदार्थ  खा.
*११)*  एकाचवेळी  सर्व  उपाय  करू  नका.
🌺🌺🌺े

*जीभेची  साले  निघत  असल्यास*

*उपाय -----*

*१)*  पुदिन्याची  पाने  आणि  खडीसाखर  मिक्स  करून  चावून  थुंकत  रहा.
*२)*  एक  केळ  गाईच्या  दूधाबरोबर  खावे.
*३)*  त्रिफळाच्या  काड्याने  गुळण्या  करा. जंतुसंसर्ग  कमी  होतो.
🌺🌺🌺े

     #     *आरोग्य  संदेश*    #

*व्यायामानेच  पचनशक्ती  वाढवा*

*उपाय -------*

*१)*  नारळाची  शेंडी  जाळून  राख  बनवा.
*२)*  ती  राख  २/३  ग्रँम  ताकातून  घ्या.
*३)*  रिकाम्या  पोटीच  घ्या.
*४)*  सकाळ  व  संध्याकाळ  घ्या.
*५)*  मुळा /  सुरण  भाजी  खा.
*६)*  अक्रोड  खाऊन  वर  दूध  प्या.
*७)*  जेवणात  कच्चा  कांदा  खा.
*८)*  श्वास  रोखू  बटरफ्लाय  व्यायाम  करा.
*९)*  हलका  आहार  घ्या.  गाईचे  तुप  खा.
*१०)*  पोट  साफ  ठेवा.
*११)*  नियमित  प्राणायाम  करा.
*१२)*  चोथायुक्त  पदार्थ  खा.
*१३)*  शाकाहारी  राहण्याचा  प्रयत्न  करा.
*१४)*  एकाचवेळी  सर्व  उपाय  करू  नका.
🌺🌺🌺े

#     *आरोग्य   संदेश*      #

पोट  राहूद्या  नियमित  साफ,
मुळव्याधीचा   चूकेल   व्याप.

*काळ्या द्राक्षांचे 10 फायदे, वाचाल तर रोज खाल*

*1. डायबिटीस, ब्लड प्रेशरवर नियंत्रण*

काळी द्राक्ष नियमित खाल्यामुळे डायबिटीस आणि ब्लड प्रेशर नियंत्रणात राहतं. काळ्या द्राक्षांमध्ये रेसवटॉल नावाचा पदार्थ असतो, ज्यामुळे रक्तात इन्सुलिन वाढतं. ही द्राक्ष खाल्यामुळे शरिरातलं रक्त वाढायलाही मदत होते, त्यामुळे ब्लड प्रेशरचा त्रास होत नाही.

*2. एकाग्रता वाढायला मदत*

काळी द्राक्ष खाल्यामुळे एकाग्रता आणि स्मरणशक्ती वाढायला मदत होते. तसंच मायग्रेनसारखा आजारही या द्राक्षांमुळे बरा होतो.
🌺🌺🌺े

*3. हार्ट ऍटेकचा धोका कमी*

काळ्या द्राक्षांमध्ये सायटोकेमिकल्स असतात जे हृदयाला स्वस्थ ठेवतात. तसंच या द्राक्षांमुळे कोलेस्ट्रॉलही नियंत्रणात राहतं, ज्यामुळे हार्ट ऍटेकचा धोका कमी होतो.

*4. वजन होतं कमी*

नियमित काळी द्राक्ष खालली तर वजन कमी होऊ शकतं. यामध्ये असणारा एँटीऑक्साईड शरिरात जास्तीचं असलेलं टॉक्सिन्स बाहेर काढायला मदत करतो. ज्यामुळे वजन कमी होतं.
🌺🌺🌺े

*5. अस्थमा होतो बरा*

काळी द्राक्ष शरिरात असलेल्या बॅक्टेरिया आणि फंगसला मारायचं काम करतात, जी इंफेक्शन तयार करतात. पोलिओविरुद्ध लढण्यासाठीही द्राक्ष हा चांगला उपाय आहे. काळ्या द्राक्षांमुळे अस्थमा बरा व्हायला मदत होते.

*6. कॅन्सरला रोखा*

काळी द्राक्ष खाल्यामुळे ब्रेस्ट, लंग, प्रोस्टेट आणि आतड्यांच्या कॅन्सरच्या धोक्यापासून वाचता येऊ शकतं.

*7. अपचन होत नाही*

काळ्या द्राक्षांमध्ये शुगर, ऑरगॅनिक ऍसिड आणि पॉलीओस जास्त प्रमाणात असल्यामुळे अपचन आणि पोटाची जळजळ होत नाही.
🌺🌺🌺े

*8. डोळ्यांसाठी गुणकारी*

दृष्टी सुधारण्यासाठीही काळी द्राक्ष गुणकारी आहेत.

*9. सुरकुत्या होतात कमी*

काळ्या द्राक्षांमुळे डोळ्यांखाली होणारा काळा भाग कमी करतो. तसंच त्वचेवर पडणाऱ्या सुरकुत्याही यामुळे कमी होतात.
🌺🌺🌺े

*10.  केस गळती थांबवायला मदत*

काळ्या द्राक्षांमध्ये असलेल्या विटॅमिन इ मुळे केस गळणं, केस पांढरे होणं यासारख्या समस्या दूर होतात. द्राक्ष खाल्यानं केसांच्या मुळापर्यंत रक्त पोहोचायला मदत होते, त्यामुळे केस मुलायम आणि मजबूत होतात.
शरीरावरील  काळे  डाग
🌺🌺🌺े

*उपाय -----*

*१)*  नियमित  प्राणायाम  करा.
*२)*  पचनशक्ती  स्ट्राँग  ठेवा.
*३)*  पोट  साफ  राहूद्या.
*४)*  पालेभाज्या  व  फळभाज्या  खा.
*५)*  सकाळी  ऊठल्यावर  तोंडातील  लाळ  सर्व  डागांवर  चोळून  लावा.  तोंड  धुण्यापूर्वीची  लाळ  पाहिजे.  हा  जबरदस्त  उपाय  आहे.
*६)*  कोरफड  पानातील  गर  लावा.
*७)*  आवळा  रस /  पदार्थ  घ्या.
*८)*  डागांवर  कच्च्या  पपईचा  रस  लावा.
*९)*  कडुलिंबाची  पाने  आंघोळीच्या  पाण्यात  टाकून  पाणी  उकळवून  घ्या.  नंतर  त्याच  पाण्याने  आंघोळ  करा.  मात्र  साबण  वापरू  नका.
🌺🌺🌺े

     #     *आरोग्य   संदेश*     #

करा  योग,  पळतील  रोग. संपतील  भोग.
🍲 आहार तज्ञ - ऋजुता दिवेकर यांच्या मते  आहाराविषयीच्या संकल्पना.

🍲  *नियोजनबद्ध आहार कोणता?*

आपला भारतीय संस्कृतीतील आहार योग्य आहे. भाजी, पोळी, भात, आमटी, पोहे, उपमा हे पदार्थ अतिशय पौष्टिक आहेत. आपण आपला आहार सोडून अन्य पदार्थांचे पर्याय शोधतो. म्हणून खाद्यसंस्कृती बदलते आहे. आपले वेगळेपण आपणच जपले पाहिजे. आपल्या चौरस आहाराची किंमत आपल्यालाच समजत नाही, याची खंत आहे.
🌺🌺🌺े

🏃 *वाढलेली चरबी कशी कमी करावी?*

आपल्या खाण्या-पिण्याला शिस्त असेल, तर चरबी वाढणार नाही. वाढली तरी कमी होण्यासही मदत होईल. सलग ३० मिनिटे एका जागेवर बसू नका. आपण शरीराचा पुरेसा वापर करीत नाही म्हणून चरबी वाढते. दरवर्षी अर्ध्या किंवा एक किलोने वजन वाढते. वजन वाढते, याचा अर्थ आपण आळशी होत आहोत, हे समजून घ्या. म्हणून गरज आहे ती `मूव्ह मोअर अँड सिट लेस` या मंत्राची.
🌺🌺🌺े

🍇 *कोणती फळे खावीत?*

आंबा, केळे, सीताफळ, चिकू आणि द्राक्ष ही फळे प्रत्येक भारतीयाच्या आहारात आवर्जून आलीच पाहिजेत. आरोग्यासाठी केळे हे सर्वोत्तम असल्याचा दुजोरा आता जगभरातून मिळत आहे. बाळाच्या आहारातही आईच्या दुधानंतर फळांमध्ये केळ्याचाच समावेश होतो.

◆ *मधुमेहासाठी आहार कसा असावा?*

खरं तर मधुमेहींनी जे पदार्थ खाल्ले पाहिजेत, तेच पदार्थ डॉक्टर टाळण्यास सांगतात. मात्र, भात, केळं आणि तुपाचा समावेश आहारात अवश्य असावा. दोन जेवणांमध्ये फार अंतर ठेऊ नये, व्यायाम भरपूर करावा आणि अगदी झोपेपर्यंत टीव्ही पाहणे टाळावे.
🌺🌺🌺े

◆ *शुगर-फ्रीचा वापर करावा का?*

शुगर फ्री आहारातून वर्ज्यच करा. आहारात जेवढी साखर आवश्यक असते, तेवढी खावी. लाडू, हलवा यासारख्या घरी बनणाऱ्या गोड पदार्थांत वापरली जाणारी साखर आरोग्यासाठी चांगली असते. ऊस आणि गूळ यांना एकमेकांशी रिप्लेस करू नये. आवश्यकतेनुसार पदार्थात साखर किंवा गुळाचा वापर करावा. शरीरातील उष्णता वाढवायला गुळाची मदत होते.
🌺🌺🌺े

◆ *वाढतं वजन आणि ताण यांचा संबंध कसा आहे?*

वाढत्या ताणामुळे वजन वाढतं. फर्गेट, फर्गिव्ह आणि फॉर्वर्ड या सूत्रानुसार जीवन जगायला सुरवात केल्यास आयुष्यातील तणाव कमी होतील.
🌺🌺🌺े

● *कडधान्य कशी खावीत..*

आपण उसळ करताना कडधान्य शिजवून घेतो. त्यामुळे मोड आलेली कडधान्ये कच्ची कशासाठी खायची? ती उकडून, उसळ करून खाणेच योग्य.

● *जेवणात कोणते तेल आणि किती वापरावे?*

शेंगदाण्याचे घाण्यावरून करून आणलेले तेल स्वयंपाकासाठी सर्वोत्तम आहे. शंभर ग्रॅम शेंगदाण्याचे २५ ते ३० टक्के तेल निघते. बाकी चोथा वाया जातो. तेल बनविण्याची पारंपरिक पद्धत अतिशय शुद्ध आहे. आहारात तेल बदलण्याची गरज नसते. पिशव्या किंवा डब्यांमध्ये मिळणारे आणि हृदयाच्या आकाराचे चित्र डब्यांवर दिसणारे तेल आरोग्याला योग्य नाही. तेल जेवढे वापरावेसे वाटते, तेवढे वापरावे. लोणचे, तळलेला पापड, भजी हे पदार्थ आहारात आलेच पाहिजेत. जास्त तेल पोटात जाईल, म्हणून ते खाणे टाळू नये.
🌺🌺🌺े

🚫 *आहारातून ड जीवनसत्त्व कमी झाल्यास काय होते?*

शरीरात हवे असलेले फॅट मिळत नाहीत, म्हणून ड जीवनसत्व कमी होते. वेळेवर त्यावर उपाय न केल्यास हाडे दुखतात, केस गळतात, त्वचेवर डाग पडतात. मधुमेह किंवा कॅन्सर होण्यापर्यंत ही पातळी जाऊ शकते.

*आजकाल बिझी रुटीनमुळे व्यायाम करणे अनेकांना शक्य होत नाही. व्यायामाला दुसरा काही पर्याय आहे का?*

आजच्या युगात आपण नवीन गाडी घेतली, तरीसुद्धा ती नियमितपणे चालवतो. बाहेरगावी गेलो, तरी शेजारी किंवा नातेवाईकांना गाडी सुरू ठेवायला सांगतो. व्यायामाचेसुद्धा तसेच आहे. व्यायामाला कोणताही पर्याय नाही, तो नियमितपणे केलाच पाहिजे. अंग दुखतं, म्हणून व्यायाम करत नाही, अशी सबब अनेक जण देतात. पण खरे तर व्यायाम करत नाही, म्हणून अंग दुखतं. व्यायाम करण्यासाठी आठवड्यात फक्त १५० मिनिटे लागतात. आठवड्याच्या व्यायामाचे नीट प्लानिंग करून ते वेळापत्रक पाळले जायला हवे. व्यायाम अनेकदा उद्यावर ढकलला जातो, त्याचं योग्य नियोजन होत नाही, त्याचं गांभीर्य लोकांच्या लक्षात येत नाही.
🌺🌺🌺े

✌ *दोन- दोन तासाने खा, असे सांगितले जाते. हे योग्य की अयोग्य?*

सकाळी उठल्या उठल्या आपण चहाने सुरुवात केली, तर दिवसभराची भूक मरते आणि दिवसभराचे रुटीन बिघडते. दोन- दोन तासाने खावे. सकाळी उठून एखादं केळ खाल्लं की, आपण नंतर नीट नाश्ता करू शकतो. सकाळी नाश्त्याला डोसा, घावन, थालीपीठ असं खावं. त्यानंतर जेवणाआधी पन्हं, कोकम सरबत यासारखं पेय घेऊन त्यानंतर आपण नियमित जेवण घेऊ शकतो. जेवताना शक्यतो पाणि पिऊ नये,जेवणाच्या अर्धा तास आधी एक ग्लास पाणि प्यावे व जेवणानंतर एक तासाने पाणि प्यावे.त्यानंतर मध्ये एखाद- दुसरं फळ, संध्याकाळी चार ते सहाच्या मध्ये पुन्हा सकाळच्या नाश्त्याप्रमाणे आहार घेतला की, आपल्याला रात्री फार भूक लागत नाही. मग रात्री पेज किंवा भात खावा, म्हणजे आपल्याला शांत झोप लागू शकते.

🍚 *घरी केलेले चिवडा, लाडू खाण्याची योग्य वेळ कोणती?*

चिवडा आणि लाडू आपण कधीही खाण्यासाठीच तयार करून ठेवतो. चिवड्यासारखी व्हर्सेटाइल गोष्ट कोणतीच नाही. चिवडा कशातही मिक्स करून खाऊ शकतो, त्यामुळे चिवडा कोणत्याही वेळी खाता येईल. लाडूसुद्धा संध्याकाळी ५-६च्या आसपास किंवा सकाळी नाश्त्यालासुद्धा लाडू चांगला.
🌺🌺🌺े

👨👩 *वाढत्या वयाबरोबर कसा व्यायाम करावा ?*

वयानुसार आपलं शरीर बदलतं, पण ते बिघडू देऊ नये. आपलं रुटीन नियमित फॉलो केलं पाहिजे. आठवड्याला १५० मिनिटे व्यायाम केला, तर ते कोणत्याही वयाला चालतं. वय वाढलं म्हणून व्यायाम कमी करण्याची गरज नाही.

💧 *सकाळी उठून गरम पाणी प्यायल्याने चरबी कमी होते, असा समज आहे. यात किती तथ्य आहे?*

सकाळी उठल्यावर आवड म्हणून गरम पाणी पिण्यास काहीच हरकत नाही. पण त्यामुळे चरबी अजिबात कमी होत नाही. सकाळी उठल्यावर साधं, माठाचं किंवा गरम कोणतेही पाणी आपण पिऊ शकतो.

🍲 *साखरेऐवजी गूळ वापरल्याने फायदा होतो का ?*

प्रत्येक गोष्टीचा एक विशिष्ट गुणधर्म असतो. त्यामुळे ज्या गोष्टीत साखर वापरण्याची गरज आहे, त्यात साखर वापरली पाहिजे आणि ज्या गोष्टीत गूळ वापरण्याची गरज आहे, त्यात गूळच वापरला पाहिजे. अन्यथा पदार्थाची चव बिघडते. साखर ही चांगलीच आहे. उगाच साखरेच नाव वाईट आहे. साखरेने उष्णता कमी होते, तर गुळाने उष्णता वाढते. त्यामुळे आपण पदार्थानुसार साखर किंवा गूळ वापरावा,
🌺🌺🌺े

🙆 *केस, त्वचेसाठी काय सल्ला.*

केस गळण्यापासून वाचण्यासाठी तसेच तजेलदार त्वचेसाठी आहारात भात, नारळ, तूप यांचा समावेश हवा. आहारामध्ये हळदीचा समावेश असण्याची गरज आहे. हळद केसांच्या वाढीसाठी फायदेशीर आहे.

🌞 *आपला दिवस कसा असतो?*
मी ज्या शहरात असेन, त्यानुसार दिवस प्लॅन करते. ऋतूमानानुसार आणि स्थानिक पदार्थांना आहारात प्राधान्य देतेत. रोज सकाळी पोहे खाते. सध्या उन्हाळ्यामुळे कोकम आणि पन्हं घेते. जे आवडतं, तेच पदार्थ खाते. जे पदार्थ शरीराला लागतात, ते आवर्जून खाते. कारण, आपण जे खातो, तेच आपल्या चेहऱ्यावर दिसते.

🍌 *फळ किंवा सुका मेव्याने दिवसाची सुरुवात करा*

🍲 *नाश्त्याला पोहे, उपमा, शिरा खा*

🍷 *जेवणापर्यंतच्या वेळेत सरबत घ्या*

🍎 *जेवणानंतर एखादे फळ खा*

🍲 *संध्याकाळी गूळ, तूप, पोळी किंवा फोडणीचा भात*

😇  *रात्री   ८.३०  च्या दरम्यान हलका आहार घ्या*

हलका आहार घेतल्याने झोप चांगली लागते आणि दुसऱ्या दिवशी व्यायाम करण्यास उत्साह राहतो.
🌺🌺🌺े

*आहारातून  उपचार*

पुढील  आजार  झाल्यास  त्यांच्या  खाली  दिलेले  अन्नपदार्थ  खा.  आजार  लवकर  बरे  होतील.

*१)  आम्लपित्त :-*
काळी  मनुका,  आलं,  थंड  दुध,  आवळा, जिरे  खा.

*२)  मलावरोध  :-*
पेरु,  पपई,  चोथा /  फायबरयुक्त  असलेले  अन्न,  दुध + पाणी,  कोमटपाणी ,  त्रिफळा  चूर्ण  घ्या.  पोटाचे  व्यायाम  करा,  टाँयलेटला  बसल्यावर  हनुवटी  प्रेस  करा.  लवकर  पोट  साफ  होते.

*३)  हार्टअटैक / ब्लॉकेज :-*
लसूण,  कांदा,  आलं  खा.  रक्ताच्या  गाठी  होत  नाहीत.  रक्ताभिसरण  उत्तम  होते.

*४)  डिसेन्टरी / जुलाब :-*
कापूर  +  गुळ  एकत्र  करून  खा.  त्यावर  पाणी  प्या.  लगेच  गुण  येतो.

*५)  खोकला :-*
२ / ३   काळीमिरी  चोखा.  दिवसातून  तीन  वेळा.  खोकला  थांबतो.

*६)  मुळव्याध :-*
नारळाची  शेंडी  जाळून  राख  ताकातून  दिवसातून  २ / ३  वेळा  घ्या.  चांगला  गुण  येतो.  रामदेव  बाबांचा  उपाय  आहे.

*७)  दारूचे  व्यसन :-*
वारंवार  गरम  पाणी  प्या.  तसेच  दारू  पिण्याची  आठवण  येईल  त्यावेळी  जरूर  गरमच  पाणी  प्या.  २ / ३  महीन्यात  दारू  सुटेल.

*८)  डोळे  येणे :-*
डोळ्यांना  गाईचे  तुप  लावा.  आराम  पडेल.  कापूर  जवळ  ठेवा.  संसर्ग  वाढणार  नाही.

*९)  स्टोन :-*
पानफुटीची  पाने  खा.  कुळीथ  भाजी  खा.  भरपूर  पाणी  प्या.

*१०)   तारूण्यासाठी :-*
भाज्यांचा  रस,  आरोग्य  पेय,  फळे  खा. गव्हांकुराचा  रस,  Green  Tea  ,प्या.
🌺🌺🌺े

    📢     *आरोग्य  संदेश*    🔔

*संतुलित  आहारात  उपचार  आहेत खरे, सर्वच    आजार    नक्कीच   होतील  बरे.*
 

*आर्टीकल जरा मोठे आहे ,पण जीवनावश्यक आहे*🙏🙏
🌺🌺🌺े

#स्रोत - आयुर्वेदाचा शोध लावणारे आणि जगातील पहिली शस्त्रक्रिया करणारे ऋषी सुश्रुत आणि वागभट्ट यांचा ग्रंथावर आधारित.
: *छत्रपती श्री शिवाजी महाराज कसले कसले जनक आहेत ? एकदा वाचुन तर पहा.. कोणाशीही चर्चा करताना फायद्याचे ठरेल.*
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
*१* जगाच्या इतिहासातील पहिलाच काळ "शिवशाही" ज्या काळात एकाही शेतकऱ्याने कधी आत्महत्या केली नाही त्या शिवशाही चे राजे - *छत्रपती श्री शिवाजी महाराज*
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
*२* जगातील पहिली "वेतनधारी पद्धत" म्हणजे आजही आपल्याला जो नोकरीत महिन्याचा पगार मिळतो आणि चांगल्या कामाचा बोनस मिळतो त्या संकल्पनेचे उद्गाते - *छत्रपती श्री शिवाजी महाराज*
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
*३* जगातील पहिलीच "जमीन सातबारा पद्धत" सुरु करणारे आणि त्यानुसार सारा (Tax) पध्दत याचे निर्माते - *छत्रपती श्री शिवाजी महाराज* 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
*४* जगाच्या इतिहासातील पहिलाच स्वराज्य ज्या काळात एकही भिकारी कधी पहायला मिळत नव्हता त्या सुवर्णाळाचे साक्षात् परमेश्वर - *छत्रपती श्री शिवाजी महाराज*
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
*५* जगातील पहिलीच सुवर्ण संकल्पना "पानी आडवा पानी जिरवा, झाडे लावा झाडे जगवा" म्हणजेच सामाजिक वनीकरण ही संकल्पना सत्यात उतरवणारे - *छत्रपती श्री शिवाजी महाराज*
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
*६* जगातील "सर्वोत्कृष्ट किल्ला राजगड" जो किल्ला पाहुन जगभरातील अभियंत्यानी राजगड बांधणाऱ्या अभियंत्याला मुजरा केला ते राजगड चे अभियंते म्हणजे - *छत्रपती श्री शिवाजी महाराज*
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
*७* जगाच्या इतिहासातील पहिलाच राजा असा आहे ज्या राजासाठी त्या काळातील "प्रजा सर्वस्व बलिदान" करण्यासाठी आतुरलेली असायची असे एकमेव राजे - *छत्रपती श्री शिवाजी महाराज* 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
*८* जगाच्या इतिहासातील पहिलेच व्यक्तिमत्वं असे आहे की ज्या व्यक्तिमत्वासाठी *३५० वर्षे झाले* तरी आजही *१२०+ देशात* अभ्यास चालु आहे असे एकच जिजाऊंचे पुत्र - *छत्रपती श्री शिवाजी महाराज*
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
*९* जगातील एकमेव राजा असा आहे ज्याचा जन्म आणि मृत्यु किल्ल्यावरच झाला तो राजा म्हणजे - *छत्रपती श्री शिवाजी महाराज*
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
*१०* अख्ख्या जगाने आदर्श घ्यावा आणि साऱ्या जगाला प्रेरणादायी ठरणारे असे *जगातील सर्वश्रेष्ठ व्यक्तिमत्वं  छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा...👏👏*

आपला राजा कुठल्याही धर्माविरुद्ध
नसुन तो फक्त अन्यायाविरुद्ध होता"!!
सर्वाना विनंती आहे कि,
काळजीपूर्वक वाचा व विचार करा .
शक्य तेवढा फोरवर्ड करा..
खुप आनंद होईल...

*💥॥ जय जिजाऊ-जय शिवराय "*
👤 *पुरुषांनाही रडण्यासारखी एक कविता*
🙎 ||  *लेक माझी* || 🙎
.................................................
🙎 अशी कशी लेक, देवा,
माझ्या पोटी येते
नाव सुद्धा माझं ती
इथेच ठेऊन जाते।।🙎
.
🙎 पहिला घास, देवा, ती
माझ्या कडून खाते
माझाच हात धरुन ती
पहिलं पाऊल टाकते।। 🙎
.
🙎 माझ्याकडूनच ती
पहिलं अक्षर शिकते
तिच्यासाठी सुद्धा मी
रात्र रात्र जागतो।।🙎
.
🙎 कुशीत माझ्या झोपण्यासाठी
ती गाल फुगवुन बसते
मी आणलेला फ्रॉक घालून
घर भर नाचते।।🙎
.
🙎 अशी कशी लेक, देवा,
माझ्या पोटी येते
असे कसे वेगळे हे
तिचे माझे नाते।। 🙎
.
🙎 एक दिवस अचानक, ती,
मोठी होऊन जाते
बाबा , तूम्ही दमला का, ?
हळूच मला विचारते॥ 🙎
.
🙎 माझ्या साठी कपडे, चप्पल,
खाऊ घेऊन येते
नव्या जगातील नविन गोष्टी
मलाच ती शिकवते।। 🙎
.
🙎 तिच्या दूर जाण्याने
कातर मी होतो
हळूच हसून मला ती
कुशीत घेऊन बसते।।🙎
.
🙎 कळत नाही मला, देवा,
असे कसे होते
कधी जागा बदलून ती
माझीच आई होते।।🙎
.
🙎 देव म्हणाला, ऐक, पोरी
तुझे, तिचे नाते विश्वाच्या ह्या साखळीची
एक कडी असते।। 🙎
.
🙎🙎 तुझ्या दारी फुलण्यासाठी
हे रोप दिले असते
सावली आणि सुगंधाशी तर
तुझेच नाते असते।।🙎🙎
.
🙎🙎 वाहत्या प्रवाहाला, कोणी,
मुठीत कधी, का, धरते ?
मार्ग आहे ज्याचा, त्याचा
पुढेच असते जायचे।।🙎
.
🙎 तुझ्या अंगणातली धारा ही
"जीवनदात्री" होते
आणि वाहती राहण्यासाठीच
"गंगा" ''सागराला" मिळते।
एक तरी मुलगी असावी
उमलताना बघावी
नाजूक नखरे करताना
न्याहाळायला मिळावी 🙎🙎
.
🙎 एक तरी मुलगी असावी
साजिरी गोजिरी दिसावी
नाना मागण्या पुरवताना
तारांबळ माझी उडावी 🙎🙎
.
🙎 एक तरी मुलगी असावी
मैचींग करताना बघावी
नटता नटता आईला तिने
नात्यातली गंमत शिकवावी 🙎🙎
.
🙎🙎 एक तरी मुलगी असावी
जवळ येऊन बसावी
मनातली गुपितं तिेने
हळूच कानात सांगावी 🙎🙎
.
😊😊एक तरी मुलगी असावी
गालातल्या गालात हसावी
कधीतरी भावनेच्या भरात गळ्यात मिठी मारावी......!
🙎 *एक तरी मुलगी असावी* 🙎
😊 *खरच ज्याना मुलगी आहे त्यांचे खुप भाग्य आहे...*💐💐💐🙏🏻🙏🏻

शनिवार, ४ फेब्रुवारी, २०१७

मेक इन पारधेवाडी

दुर्गम भागात मेडिकल दुकान असेल-नसेल. पण सॅनिटरी नॅपकिन मिळायला हवा, या निग्रहाने छाया काम करते आहे. ‘नवी उमेद’वर सॅनिटरी नॅपकिन्सविषयीच्या पोस्ट्स वाचून छाया काकडेने आमच्याशी संपर्क केला.

पारधेवाडीच्या (ता.औसा, जि.लातूर) मुली-महिलांना सॅनिटरी नॅपकिन्स आणण्यासाठी प्रवास आणि वीस-तीस रुपये खर्च करून औशात किंवा लातुरला जावे लागायचे. आज छायाच्या प्रयत्नांमुळे अवघ्या ३० रुपयांत सहा नॅपकिन्सचे पाकिट पारधेवाडीतच मिळते. औसा तालुक्यातील २० टक्के महिला गर्भाशयविकारग्रस्त, बहुतांश विशी-तिशीच्या, मासिक पाळीतील अस्वच्छता, उघड्यावर शौचास जाणे हीच याची कारणे – स्वतःच केलेल्या अभ्यासातले हे निष्कर्ष छायाच्या कामाची प्रेरणा ठरले.

१९९३ साली, किल्लारी भूकंपानंतर १८ वर्षांची छाया समाजकार्यात गुंतली. बाबा आमटेंच्या शिबिरात भाग घेतला. ‘मानवलोक’ची कार्यकर्ती बनली. ‘बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशन’च्या आरोग्यकार्यशाळेसाठी थेट अमेरिकेला गेली. तिथून नॅपकिन्सनिर्मितीची शास्त्रशुद्ध माहितीही मिळवली.

मासिक पाळीबद्दलची गुप्तता,  ग्रामीण भागात मुलींची शाळा थांबण्याचे ते एक कारण, पॉलिएस्टर कापडवापरामुळे नाजुक ठिकाणी इजा होणे, वापरलेले कापड धुण्या-वाळवण्याची, अस्वच्छ पद्धत, पाणीटंचाईमुळे वाढणारी अस्वच्छता, यामुळे होणारा जंतुसंसर्ग....ही साखळी छायाला तोडायची होती. इंजिनियर नवर्‍याची साथ, मानवलोक, सोलापूर विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. देवेंद्रनाथ मिश्रा यांचे सहकार्य मिळाले. छायाने पारधेवाडीत ना नफा-ना तोटा तत्त्वावर ‘रिफ्रेश सॅनिटरी नॅपकीन शुअर स्टार्ट प्रकल्प’ सुरू केला.

रिफ्रेश नॅपकिन्सचा रास्त दरही ज्या मुली-महिलांना परवडत नाही, त्यांना नॅपकिन्स मोफत देण्याची छायाची योजना आहे. देणगीदारांमुळे सध्या ८०० गरीब मुलींना नॅपकीन्स मोफत वाटले जातात. ही संख्या महिन्यागणिक वाढत आहे.

यामागचे अर्थकारण काय? पारधेवाडीच्या युनिटमध्ये २५ लाख भांडवल गुंतवले आहे. ११० रु रोजंदारीवर ३० महिला काम करतात. रोज १ हजार नॅपकिन्स बनतात. एका पाकिटाच्या ३० रु विक्रीमागे २ रुपये सुटतात. पण अमेरिका आणि दुबई इथल्या मैत्रिणी आणि ‘वूमन’सारख्या अमेरिकन संस्था तेच पाकिट ६० ते ७० रु ना विकत घेतात. दरमहा ५ हजार पाकिटे अमेरिकेला पाठवली जातात. त्या नफ्यातून इथे विक्रीकिंमत कमी ठेवता येते. प्रकल्पात २५० महिला मासिक १२०० रु मानधनावर आपापल्या गावात नॅपकिनवापराचा, स्वच्छतेचा प्रसार करतात. महिलांच्या पाळीची संभाव्य तारीख माहीत करून घेऊन चार दिवस आधी तिच्या घरापर्यंत पाकिट पोचवतात. औसा तालुक्यातील ६० गावांमध्ये नॅपकिन वाटपासोबतच मासिक पाळी व संबंधित विषयांची माहिती देतात. महाराष्ट्रातल्या अशा प्रकारच्या या पहिल्याच प्रकल्पाने जाणत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
महाविद्यालयांत सॅनिटरी नॅपकिन्स वेंडिंग आणि डिस्पोजल मशीन्स हवीत या शासन निर्णयाच्या पूर्ततेसाठीही छाया प्रयत्न करते. ही मशीन्स दिल्लीहून मागवून घेते. मशीन्स महाराष्ट्रात मिळाली तर खूपच खर्च वाचेल, असं तिचं म्हणणं.

२०१५ साली प्रकल्पाची जुळवाजुळव करताना लोकांनी अज्ञातून कामाची टवाळी केली. त्याला न जुमानता छायाने मुली-महिलांमध्ये जागृती केली. सॅनिटरी नॅपकीन तयार करण्याबरोबरच नॅपकीनवापराबद्दलची जागृती करून छाया काकडेने एका मोठ्या कामाचा आरंभ केला आहे.

संपर्क : छाया सतीश काकडे, विचारधारा ग्रामीण विकास संस्था, आशिव,
       केंद्र पारधेवाडी, ता. औसा, जि. लातूर मोबाइल: 9421504813

दुर्गम भागात मेडिकल दुकान असेल-नसेल. पण सॅनिटरी नॅपकिन मिळायला हवा, या निग्रहाने छाया काम करते आहे. ‘नवी उमेद’वर सॅनिटरी नॅपकिन्सविषयीच्या पोस्ट्स वाचून छाया काकडेने आमच्याशी संपर्क केला.

पारधेवाडीच्या (ता.औसा, जि.लातूर) मुली-महिलांना सॅनिटरी नॅपकिन्स आणण्यासाठी प्रवास आणि वीस-तीस रुपये खर्च करून औशात किंवा लातुरला जावे लागायचे. आज छायाच्या प्रयत्नांमुळे अवघ्या ३० रुपयांत सहा नॅपकिन्सचे पाकिट पारधेवाडीतच मिळते. औसा तालुक्यातील २० टक्के महिला गर्भाशयविकारग्रस्त, बहुतांश विशी-तिशीच्या, मासिक पाळीतील अस्वच्छता, उघड्यावर शौचास जाणे हीच याची कारणे – स्वतःच केलेल्या अभ्यासातले हे निष्कर्ष छायाच्या कामाची प्रेरणा ठरले.

१९९३ साली, किल्लारी भूकंपानंतर १८ वर्षांची छाया समाजकार्यात गुंतली. बाबा आमटेंच्या शिबिरात भाग घेतला. ‘मानवलोक’ची कार्यकर्ती बनली. ‘बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशन’च्या आरोग्यकार्यशाळेसाठी थेट अमेरिकेला गेली. तिथून नॅपकिन्सनिर्मितीची शास्त्रशुद्ध माहितीही मिळवली.

मासिक पाळीबद्दलची गुप्तता,  ग्रामीण भागात मुलींची शाळा थांबण्याचे ते एक कारण, पॉलिएस्टर कापडवापरामुळे नाजुक ठिकाणी इजा होणे, वापरलेले कापड धुण्या-वाळवण्याची, अस्वच्छ पद्धत, पाणीटंचाईमुळे वाढणारी अस्वच्छता, यामुळे होणारा जंतुसंसर्ग....ही साखळी छायाला तोडायची होती. इंजिनियर नवर्‍याची साथ, मानवलोक, सोलापूर विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. देवेंद्रनाथ मिश्रा यांचे सहकार्य मिळाले. छायाने पारधेवाडीत ना नफा-ना तोटा तत्त्वावर ‘रिफ्रेश सॅनिटरी नॅपकीन शुअर स्टार्ट प्रकल्प’ सुरू केला.

रिफ्रेश नॅपकिन्सचा रास्त दरही ज्या मुली-महिलांना परवडत नाही, त्यांना नॅपकिन्स मोफत देण्याची छायाची योजना आहे. देणगीदारांमुळे सध्या ८०० गरीब मुलींना नॅपकीन्स मोफत वाटले जातात. ही संख्या महिन्यागणिक वाढत आहे.

यामागचे अर्थकारण काय? पारधेवाडीच्या युनिटमध्ये २५ लाख भांडवल गुंतवले आहे. ११० रु रोजंदारीवर ३० महिला काम करतात. रोज १ हजार नॅपकिन्स बनतात. एका पाकिटाच्या ३० रु विक्रीमागे २ रुपये सुटतात. पण अमेरिका आणि दुबई इथल्या मैत्रिणी आणि ‘वूमन’सारख्या अमेरिकन संस्था तेच पाकिट ६० ते ७० रु ना विकत घेतात. दरमहा ५ हजार पाकिटे अमेरिकेला पाठवली जातात. त्या नफ्यातून इथे विक्रीकिंमत कमी ठेवता येते. प्रकल्पात २५० महिला मासिक १२०० रु मानधनावर आपापल्या गावात नॅपकिनवापराचा, स्वच्छतेचा प्रसार करतात. महिलांच्या पाळीची संभाव्य तारीख माहीत करून घेऊन चार दिवस आधी तिच्या घरापर्यंत पाकिट पोचवतात. औसा तालुक्यातील ६० गावांमध्ये नॅपकिन वाटपासोबतच मासिक पाळी व संबंधित विषयांची माहिती देतात. महाराष्ट्रातल्या अशा प्रकारच्या या पहिल्याच प्रकल्पाने जाणत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
महाविद्यालयांत सॅनिटरी नॅपकिन्स वेंडिंग आणि डिस्पोजल मशीन्स हवीत या शासन निर्णयाच्या पूर्ततेसाठीही छाया प्रयत्न करते. ही मशीन्स दिल्लीहून मागवून घेते. मशीन्स महाराष्ट्रात मिळाली तर खूपच खर्च वाचेल, असं तिचं म्हणणं.

२०१५ साली प्रकल्पाची जुळवाजुळव करताना लोकांनी अज्ञातून कामाची टवाळी केली. त्याला न जुमानता छायाने मुली-महिलांमध्ये जागृती केली. सॅनिटरी नॅपकीन तयार करण्याबरोबरच नॅपकीनवापराबद्दलची जागृती करून छाया काकडेने एका मोठ्या कामाचा आरंभ केला आहे.

संपर्क : छाया सतीश काकडे, विचारधारा ग्रामीण विकास संस्था, आशिव,
       केंद्र पारधेवाडी, ता. औसा, जि. लातूर मोबाइल: 9421504813

शुक्रवार, ३ फेब्रुवारी, २०१७

डॉ. अब्दुल कलाम यांना पायलट बनायचे होते..
त्यासाठी कुणीही मार्गदर्शक नसल्यामुळे त्यांनी बी.एस्.सी. ला एडमीशन घेतली..

नंतर फायनल ईयरला त्यांना कळले की ,पायलट बनायचे असेल तर ईंजीनीयरींग मधील 'एयरोनॉटीकल ईंजीनीयरींग' ला प्रवेश घ्यावा लागतो !..
मार्गदर्शक नसल्यामुळे आयुष्यातील तीन वर्ष वाया घालवीले असे त्यांना वाटले !..खुप रडले!..

परंतु याच बीएससी फीजीक्सने त्यांचे जीवन घडविले !...

नंतर एयरोनाॅटीकल ईंजीनीयर ची पदवी घेतली ,त्यावर्षी संपुर्ण भारतातुन केवळ आठ मुलं ही पदवी घेऊ शकले !.. त्यात डॉ कलाम टॉपर होते !..

त्याकाळी फक्त 'एअर ईंडीया' हीच पायलटच्या जागा भरायची !..

त्यावर्षी त्यांना सात जागा भरायच्या होत्या!.अर्ज आठ !.. डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम टॉपर !..

ईंटरव्यु होऊन सीलेक्शन झाले!.

डॉ.  कलाम सोडुन सर्व उमेदवारांना नौकरी मीळाली!..
डॉ. कलाम यांची "ऊंची" कमी आहे,या निर्णयामुळे सीलेक्शन कमीटीने त्यांना नाकारले !..

डॉ. कलाम खुप हताश झाले !..

रामकृष्ण मठातच बालपण गेल्यामुळे उदास होऊन हरीद्वारच्या मठात गेले !..

तेथील स्वामीजींनी सांगीतले, " का ऊदास होतोस?.. जीवनातील एका संग्रामात अपयशी ठरलास, याचा अर्थ  नव्हे, की तु कर्तृत्ववान व यशस्वी पुरुष बनु शकत नाही !.. कदाचीत ईश्वराने तुझी निवड एखाद्या महान कार्यासाठी केली असेल !..

डॉ. कलाम घरी जाण्यासाठी दिल्लीला परत आले!..
दुस-या दिवशी पेपरमधे,"एयरोनाॅटीकल इंजीनियर पाहीजे" अशी जाहीरात होती, कुण्या विक्रम साराभाईंची !.. पगार एअर इंडीयाच्या दुप्पट !..

ईंटरव्यूहला पुन्हा तेच आठ कँडीडेट!..

एकच जागा !..

यावेळी मात्र कलाम यांचीच निवड झाली !..

दुस-या दिवशी नोकरीला गेले, म्हणाले, "सांगा विमान कुठे घेऊन जायचे?"..

विक्रम साराभाई म्हणाले, "आपल्या जवळ विमानच नाहीये ..आणि मला खात्री आहे की हे विमान तूच बनवू शकशील!"..

पुढचा इतिहास तुम्हाला माहीती आहे !..

तर मित्रांनो !.. तुम्ही आयुष्यात जरी अपेक्षित ध्ये़य मिळवू शकले नसाल, तर डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम सर यांच्या जीवनातील हा प्रसंग विसरु नका !...

कदाचित तुम्ही भारताचे भावी कलाम सर असाल !..

 "जीवनात अयशस्वी जरी झालोत
          तरी निराश होऊ नये
                 कारण,
         F.A.I.L. चा अर्थ
    First Attempt In Learning
          असाच आहे..!!

          प्रयत्नांना कधीही
             शेवट नसतो
                कारण,
           E.N.D. चा अर्थ
      Efforts Never Die
          असाच घेऊयात..!!

     आयुष्यात कोणाकडूनही
         नकार आला तरी
          खचून जाऊ नये
               कारण,
          N.O. म्हणजे
     Next Opportunity
 म्हणून नेहमी आशावादी राहुयात
              आणि
जीवनात पुढेच चालत राहुयात;
         👍👍👍👋👋👋
2 मिनीट लागतील , पण नक्की वाचा । 

परळ भागातील प्रसिद्ध

टाटा कॅन्सर हॉस्पिटलच्या समोरील

फूटपाथवर उभा राहून तिशीतील एक तरुण

खाली उभ्या असलेल्या गर्दीकडे टक लावून

पाहत राहायचा. मृत्युच्या दारात उभं

राहिल्यामुळे रुग्णाच्या चेहऱ्यावरील

दिसणारी ती भीती,

त्यांच्या नातेवाईकांची भकास चेहऱ्याने

होणारी ती धावपळ पाहून तॊ तरुण खूप

अस्वस्थ व्हायचा. बहुसंख्य रुग्ण बाहेगावाहून

आलेले गरीब लोक असायचे. कुठे

कोणाला भेटायचे, काय करायचे

हेही त्यांना ठाऊक नसायचे. औषध

पाण्यासाठीच नव्हे तर त्यांच्याकडे

जेवायलाही पैसे नसायचे. ते सारे दृश्य पाहून

तो तरुण खूप खिन्न मनाने घरी परतायचा.

त्यांच्यासाठी आपण

काहीतरी करायला पाहिजे. रात्रंदिवस

त्याने ह्याच विचाराचा ध्यास घेतला.

आणि एक दिवस त्याने त्यातून मार्ग

काढलाच. आपलं चांगलं चाललेलं हॉटेल

त्याने भाड्याने दिलं. आणि काही पैसे उभे

राहिल्यावर त्याने चक्क

टाटा हॉस्पिटलच्या समोर

असलेल्या कोंडाजी चाळीच्या रस्त्यावर

आपला यज्ञ सुरु केला. एक असा यज्ञ जो पुढे

२७ वर्षे अविरत सुरु राहील

याची त्याला स्वतःलाही कल्पना नव्हती.

कॅन्सरग्रस्त रुग्णांना अन

त्यांच्या नातेवाईकांना मोफत भोजन

द्यायचा त्याचा हा उपक्रम परिसरातील

असंख्य लोकांना आवडला.

सुरुवातीला पाच पन्नास लोकांना भोजन

देता देता शंभर, दोनशे, तीनशे

अशी संख्या वाढू लागली तसे असंख्य हात

त्यांच्या सोबतीला येऊ लागले.

बघता बघता एकामागून एक वर्ष उलटत गेली.

कधी हिवाळा,कधी उन्हाळा तर

कधी मुंबईतला भयंकर

पावसाळाही त्यांच्या यज्ञात खंड पाडू

शकला नाही. तोपर्यंत दररोज मोफत भोजन

घेणाऱ्यांची संख्या ७०० पार करून पुढे

गेली होती. हरखचंद सावला एवढ करूनच

थांबले नाहीत. त्यांनी गरजू

रुग्णांना मोफत औषध

पुरवायालाही सुरुवात केली.

त्यासाठी त्यांनी औषधाची बँकच

उघडली. त्यासाठी तीन फार्मासिस्ट व

तीन डॉक्टरांची अन सोशल वर्करची टीमच

त्यांनी स्थापन केली. कॅन्सरग्रस्त बाल

रुग्णांसाठी त्यांनी टॉयबँकहि उघडली.

आज त्यांनी स्थापन केलेला " जीवन ज्योत "

ट्रस्ट ६० हून अधिक उपक्रम राबवत आहे. ५७

वर्षीय हरिचंद सावला आजही त्याच

उत्साहाने कार्यरत आहेत.

त्यांच्या त्या अफाट उत्साहाला,

त्यांच्या त्या प्रचंड

कार्याला शतशः प्रणाम!

२४ वर्षे क्रिकेट खेळून २००

कसोटी आणि शेकडो एक दिवसीय सामने

खेळून १०० शतके अन ३० हजार

धावा केल्या म्हणून सचिन तेंडूलकरला "

देवत्व " बहाल करणारे आपल्या देशात

करोडो लोक आहेत. पण २७ वर्षात १०-१२

लाख कॅन्सरग्रस्त रुग्णांना अन

त्यांच्या नातेवाईकाना दुपारचे भोजन

मोफत देणाऱ्या मुंबईच्या हरखचंद

सावलाना मात्र कोणी ओळखतही नाही,

आणि त्यांना देवही मानत नाही. हि आहे

आपल्या देशातील मीडियाची कृपा.

( विशेष म्हणजे गुगलवर अथक परिश्रम

करूनही त्यांचा फोटोही सापडला नाही ).

कधी पंढरपूरच्या विठोबाच्या मंदिरात,

कधी प्रभादेवीच्या सिद्धीविनायक

मंदिरात, कधी शिर्डीच्या साई मंदिरात,

तर कधी तिरुपतीच्या बालाजी मंदिरात.

आणि नाही जमलंच तर

जवळपासच्या मंदिरात जाउन देवाचा शोध

घेणाऱ्या त्या करोडो भक्तांना देव कधीच

सापडणार नाही.

तो आपल्या आजूबाजूलाच असतो. पण

आपल्याला मात्र त्याचा पत्ताच नसतो.

आपण मात्र वेड्यासारखे कधी बापू,

कधी महाराज, कधी बाबा म्हणून

त्यांच्या मागे पळत असतो. सगळे बाबा,

महाराज, बापू अब्जाधीश

होतात,आणि आपल्या व्यथा, वेदना,

आणि संकटे काही मरेपर्यंत संपत नाहीत.

गेल्या २७ वर्षात लाखो कॅन्सरग्रस्त

रुग्णांना अन

त्यांच्या नातेवाइकांना मात्र देव

सापडला तो हरखचंद सावलाच्या रुपात.

जसे चारोळी कवीता जोक इतर बातम्या लगेच पुढे पाठविता तसेच हे सुध्दा सगळयांना पाठवा अशा माणसाचा सन्मान त्यांना प्रसिध्दि मिळाली पाहीजे। ।

Please हां msg forward करा , कधी तरी हां msg त्या देव मानसा पर्यन्त पोहचेल । त्याला धन्यवाद द्यायला ।

गुरुवार, २ फेब्रुवारी, २०१७

*_आपल्या शाळा नावा रूपाला अनायाच्या असेल तर_*        
..........................................................
1 शाळेत वेळेवर हजर रहा.
2 शाळेतून वेळीवर घरी जा.
3 पूर्ण वेळ अध्यापन करा.
4 विद्यार्थ्याची गुणवत्ता दररोज तपासा.
5 गणवेश आग्रही ठेवा.
6 अध्यापनात सातत्य ठेवा.
7 निमित्त सांगणे बंद करा.
8 उणिवांवर पाणी सोडा.
9 पालकांकडून सहकार्य मागत रहा.
    शाळेची गुणवत्ता समोर मांडा.
10 आपण फक्त नोकरी करत आहोत म्हणुन कार्य करू नका.
11 फक्त विद्यार्थ्याचा विचार करा.
12 जाऊदे म्हणणे सोडा.
13 व्यवस्था ढासळली आहे म्हणून
     आपण ढासळू नका.
14 टाईमपास थांबवा.
15 आपल्या सर्वच गोष्टी चांगल्या नाही.
     आपण त्यात सुधारणा करा.
16 कोणी चुकून कामे करा असे सांगीतले म्हणून रागवू नका.
17 खेड्यात ड्युटीचा त्रास करून घेऊ नका.
18 खेड्यात ड्युटी करणाऱ्यांना कमी समजू नका.
19 फक्त आपणच शाळा उज्ज्वल करू शकता हे विसरू नका.
20 आपल्या आजूबाजूचे कामचोर सुधारा.
21 दररोज एक गोष्ट गुणवत्ता पूर्ण शाळेची इतरांना टाका, चालना मिळेल.                            
22. कुणी चांगले काम करत असेल त्याला प्रोत्साहन दया . नावे ठेऊ नका सहकार्य करा.
23. मला माफ करा म्हणायला शिका.
24.काम करणार्यांना फूस लावू नका. स्वतःच्या बुद्धीचा वापर करा...तुम्हीही सुशिक्षित आहात हे कदापि विसरू नका...
25.वरिष्ठांचा आदर करा...(वयाने आणि नियुक्तीने असलेल्या)
26.खरे ते स्वीकारा -मान्य करा....माझे तेच खरे असा अट्टाहास धरू नका..
27.आपला अमूल्य वेळ दुसऱ्यावर टीका करण्यात घालवू नका
28.सहकार्या विषयी जाणीवपूर्वक गैर समज पसरवू नका..
29.विद्यार्थ्यांमध्ये वेळ घालवा....त्याना समजून घ्या...
कारण समाजात आणि शाळेत आपण ज्या गोष्टी देतो त्याच गोष्टी आपल्याकडे परत येत असतात...
💥💥 *शाळा म्हणजे शिक्षक आणि शाळेची हानी तर आपली मानहानी.*  💥💥
•●प्रेरणा कशास म्हणतात●•
*न्यूटनच्या वर्गात त्याच्या व्यतिरिक्त अजूनही ५० विद्यार्थी होते!!*

*आईन्स्टाईनचा वर्गही काही रिकामा नव्हता!!*

*बाबासाहेब तर वर्गाबाहेर बसून नुसतंच ऐकायचे!!*

*यांच्या मास्तरांनी सगळ्या वर्गाला एकसारखेच ज्ञान दिले होते!!*

*मग त्यांच्यातले हे एकएकटेच एवढे का शिकले?*

*तुकोबा ज्ञानोबा तर शाळेतच गेले नव्हते!!*

*शिवबांनी युद्धनीती कुठल्या मास्तर कडे शिकली होती?*

*तेंडुलकरच्या मास्तरांनी किती सेंच्युरी मारल्या होत्या?*

*आंबेडकरांच्या मास्तरांना किती घटना लिहिण्याचा अनुभव होता?*

*हे सगळेच शिकले कारण त्यांना शिकायचे होते!!*

*मास्तरांचे क्वालिफिकेशन त्यांच्या दृष्टीने गौण होते!!*

*सिलॅबसचे बंधन त्यांनी स्वतःस घातले नव्हते!!*

*आम्ही त्यांना देव मानून मोकळे होतो आणि आमचेच हात बांधून ठेवतो!!*

*आमच्या अपयशाचे खापर आमच्याच मास्तरांच्या अज्ञानावर फोडून मोकळे होतो!!*

*भरपूर फी घेणाऱ्यांना ज्ञानी म्हणतो आणि त्यांचे खाजगी क्लास लावतो!!*

*पण माझे शिक्षण त्यांच्या ज्ञाना मध्ये नाही हे सोईस्कर विसरतो!!*

*पैसे देऊन प्रयत्न विकत घेण्याचा विनोद आम्ही करतो, आमच्या मनालाच आम्ही फसवत राहतो!!*

*माकडांचे उड्या मारण्याचे क्लासेस कुणी बघितले आहेत का?*

*कि बदकांचे पोहण्याचे क्लासेस कुठे चालू आहेत का?*

*वाघिणीच्या शिकारीच्या क्लासेसच्या ऍडमिशन्स फुल झाल्याच्या बघितल्या आहेत का?*

*लंगड्या माकडीणीची पोरं उड्या मारायला शिकलीच नाहीत असं कुठं झालंय का?*

*आंधळ्या वाघिणीची मुलं कंद मुळं खाऊन राहिलेली कुणी पाहिलीत का?*

*निसर्गामध्ये कुणीच कुणाला शिकवत नसतो, ज्याची त्याची गरज म्हणून जो तो शिकत असतो!!*

*प्रयत्न आणि अनुभव हाच ज्याचा त्याचा मास्तर असतो!!*

*शिक्षक फक्त आपले भरकटलेपण दाखवितो, यशाचा मार्ग आपला आपणच शोधायचा असतो!!*

*आकाशा खालचं सगळं जग हाच ज्याचा त्याचा सिलॅबस असतो!!*

*शिक्षकांचा दर्जा शिक्षणाचा दर्जा *शाळेचा दर्जा कॉलेजचा दर्जा ह्या सगळ्याला दोष दिला जातो कारण माझ्या प्रयत्नांचा दर्जा खूपच खालावलेला असतो!!*

●लेखन-विश्वास नांगरे पाटिल●
__________________________

Absolutely true post....