मंगळवार, २२ ऑगस्ट, २०१७

माझे शिक्षण

[23/08, 4:56 AM] 👏🏻: मी गावात फिरत होतो.तेंव्हा एक भला माणूस मुलांची नावे लिहित होता.मी म्हटलं,अहो काका ही नाव कशासाठी लिहिताय.' त्यांच्या त्या प्रसन्न चेह-यावर हसु फुललं.त्यांच्या मिशा हलल्या.गालात स्मित हास्य करीत तो म्हणाला,"लातूरला आम्ही भूकंपग्रस्त मुलांसाठी शाळा सुरु करतोय; तू येणार का?"
मी लगेच होकार दिला.त्या भल्या माणसानं माझं नाव लिहिलं, श्याम गुमानगिर गिरी.तारीख सांगितली व "या "असं म्हणाले.
तो भला माणुस म्हणजे एम.डी सर.यांचं नाव एम.डी.सर आहे हे जनकल्याण निवासी विद्यालयात गेल्यावर मला समजलं.दत्तमंदिर पाटीजवळ एका मोकळ्या जागेत भलं मोठं पत्र्याचं शेड मारलं गेलं.तोच वर्ग आणि वसतिगृह हे समीकरण नवीन होतं.१९९३ सालचा हा काळ.शिवाजी चौकातुन झुकझुक आगीनगाडी जायची मला खुप अप्रुप वाटायचं.
 भल्या पहाटे आम्हाला उठवले जायचे.भल्या पहाटे किंवा शाखेतुन आल्यानंतर थंड पाण्याने अंघोळ करीत असे.ओम नम: सच्छिदानंद रुपाय परत्माने...या एकात्मता स्तोत्राने दिवसाची सुरुवात अंबडचे  वाघमारे सर करीत असत.त्यांची ती प्रसन्न मुर्ती सोज्वळ व प्रेमळ चेहरा अजुनही लक्षात आहे.मनाचे श्लोक मला अजुनही पाठ आहेत.राजीव गांधी पुतळ्याजवळ असणा-या मैदानात बोयणे सर आम्हाला घेऊन जात.संघ दक्ष.आ रम.असा आवाज सर काढत.आम्हाला समजत नसे.नंतर हळूहळू प्रार्थना म्हणु लागलो.नमस्ते सदा वत्सले मातृभूमी.....प्रार्थना तोंडपाठ झाली.सर्व प्रभात शाखेचे नियम माहित झाले.प्रभात शाखेतील खेळात मी खुप रमत असे.सुर्यनमस्कार हा माझा आवडता व्यायामप्रकार होता.मी व माझ्या चमुने १०१ सुर्यनमस्कार घालुन शाळेला ढाल मिळवुन दिली होती.शाळेत स्वादिष्ट पोहे व दूध दिले जात असे.दूपारी रुचकर जेवण दिले जाई.मग आम्ही शिकवणीला जात असु कधी हिबारे सर,कधी केशवराज शाळेचे दीक्षित सरांकडे गणित तर संगीत शिक्षक असणारे कुलकर्णी सरांचे वडील गणित शिकवत असत.संध्याकाळी यशवंत विद्यालयाचे कदम सर इंग्रजी शिकवत असत.प्रफुल्ल कुलकर्णी सर कांही महिने मुख्याध्यापक होते.प्रफुल्ल कुलकर्णी सरांचे मराठीवर अफाट प्रभुत्व होते.कुकडे काका ब-याच वेळा भेट देऊन मार्गदर्शन करीत असत.लोमटे सर वसतिगृहाची जबाबदारी सांभाळत असत.अजय रेणापुरे सर मुलांचे इंग्रजी विषयाचे हस्ताक्षर सुधारण्यासाठी प्रयत्न करीत असत.खेडकर सर विज्ञान विषय शिकवत असत.

क्रमश:
[23/08, 4:56 AM] 👏🏻: जनकल्याण निवासी विद्यालय





जनकल्याण निवासी विद्यालय ही शाळा जनकल्याण समिती लातूरने सुरु केली होती.या शाळेत मुलांच्या संस्कारावर अधिक भर असे.मुख्याध्यापक सर्वांचे काम कडक शिस्तीने करुन घेत असत.शाळेमध्ये सर्व तास नियमित होत असत.सर्वत्र शिस्तीच दरवळ असे.रात्री मुले दहा वाजेपर्यंत अभ्यास करीत असत.शाळेतील कांही मुलांना केशवराज विद्यालयात जाण्याची संधी मिळे.मी दत्तमंदिर ते श्यामनगर पर्यंत पायी जात असे.तेथे कुलकर्णी सर प्रयोगशाळेत मुलांना प्रयोग करुन दाखवत असत. नमो मातृभूमी जिथे जन्मलो मी....हे प्रभो आनंददाता,ज्ञान हमको दिजीए अशी सुंदर प्रार्थना गीते मी केशवराज शाळेत शिकलो.होनराव सरांचा भूगोलाचा तास अविस्मरणीय वाटला.संजय जगताप सर ,मोगरगे सर,खैरनार सर यांचीही आठवण येते.केशवराज विद्यीलयात संघाची बैठक होत असे.मला ही जाण्याचा योग आला.मी पद्य गात असे
१) केशवांनी संघरुपे कल्पवृक्षा लावले..

२) हिंदु जगे तो विश्व जगेगा..

३) चंदन है इस देश की माटी...

४) भारत देश महान अमुचा..

५) मनुष्य तू बडा महान है..

६) संघठन गडे चलो सुपंथपर बढे चलो..


७) जय भवानी जय शिवराय

अशी कित्येक पद्ये मला मुखोद्गत झाली.खेळांचे प्रकार मला माहित झाले.जनकल्याण निवासी विद्यालयातील प्रत्येक व्यक्ती अहोरात्र काम कसे काय करतात ? याचे नवल वाटत असे.
आमची दहावीची प्रथम तुकडी १९९५ साली बाहेर पडली.
मी गुणवत्तेच्या जोरावर स्वयंशासन दिनाचा मुख्याध्यापक झालो होतो.जनकल्याण विद्यालयात मुलांना स्वावलंबी जीवनाचे व राष्ट्रसेवेचे पाठ शिकता आले.मुलांचे मन खुप रमले होते.अनाथ सनाथ मुलांसाठी शाळा आईच्या भूमिकेत होती.शाळेने मला घडविले.गुरुजनांनी आवश्यक तो बदल माझ्यात केला.शाळेचे नाते आई व मुलासारखे असते.आईपासुन दुरावल्यावर मुलाला वाईट वाटते.


क्रमश:



ओम सहनाववतु ....भोजनमंत्र तिथेच शिकलो.
[23/08, 4:56 AM] 👏🏻: विद्यीलय ऐवजी विद्यालय असं वाचावे.
[23/08, 4:56 AM] 👏🏻: जागृती शिबीर


पुण्यातील स्वरुप वर्धिनी समितीचे ज्ञानेश पुरंदरे,र.ज.नरवणे यांनी तीन दिवसाचे जागृती शिबीर घेतले होते.अजुनही दोघे संपर्कात आहेत.र.ज.नरवणे यांनी मला अनेक पत्र पाठवुन माझे वैचारिक प्रबोधन केले.जनकल्याण निवासी विद्यालयातील प्रत्येक मुलाची विचारपुस केली जायची.आज कदाचित ते भाग्य दुस-या शाळेतील मुलांना क्वचित मिळत असेल.शिपायापासुन प्रशासनापर्यंत सर्वचजण हे राष्ट्रीय काम आहे या भावनेने काम करीत असत.यावर्षी खेडकर सरांनी मला त्यांच्या शाळेत प्रमुख वक्ते म्हणुन बोलावले होते.अतिशय प्रेमाने माझ्याबद्दल गौरवोद्गार सरांनी काढले होते.प्रेम,आपुलकी,जिव्हाळा, सदाचार या सर्व सद्गुणांचा परिचय जनकल्याण विद्यालयात झाला.मी थोड्या काळात जी शिदोरी मिळवली ती अजुनही जपुन ठेवली.माझ्यातील विवेक विचारांना विद्यालयातुन प्रेरणा मिळाली.

इदम् राष्ट्राय इदम् न मम्

जे काही आहे ते राष्ट्राचे आहे.गेली २२ वर्षे  त्या संस्काराचा प्रभाव अाहे.


कृतार्थ मी कृतज्ञ मी👏🏻

शुक्रवार, १८ ऑगस्ट, २०१७

एक कविता

खूप छान कविता  वाचायला मिळाली…

    *भूतकाळात डोकावल्या शिवाय*

*मजा काही मिळत नाही*

*मागे वळून पाहिल्यावर*

*हसावं का रडावं कळत नाही*



*साऱ्याच गोष्टी मध्ये*

*खूप खूप बदल झाले*

*पहिल्या पेक्षा प्रत्येकाला*

*नक्कीच बरे दिवस आले*



*खरं वाटणार नाही पण*

*एवढं सगळं बदललं*

*निगरगट्ट माणूस सुद्धा*

*मुळा सकट हादरलं*



*शाळेतून घरी गेल्या गेल्या*

*दप्तर कोनाड्यात जायचं*

*दुसऱ्या दिवशी शाळेत जाताना*

*बाहेर काढल जायचं*



*अहो दप्तर म्हणजे काय*

*वायरची पिशवी असायची*

*जुन्या फाटक्या पुस्तका सोबत*

*फुटकी पाटी दिसायची*



*अभ्यास कर म्हणून कुणी*

*म्हणलंही नाही*

*अन मार्क कमी पडले म्हणून*

*हाणलंही नाही*



*कोणताही ऋतू असो*

*काळपट चहा असायचा*👌

*तडकलेल्या बशीवर*

*कानतुटका कप दिसायचा*



*बारा महिने अनवाणी पाय*

*चप्पल म्हणजे श्रीमंती*

*पायाला चटके बसायचे*

*पण सगळ्या गावात हिंडायचे*



*कुणाचं गुऱ्हाळ लागलं की*

*चला रस प्यायला*

*खळे दळे लागले की*

*चालले शेतात झोपायला*



*मरणाची गरिबी होती*

*पण मजा मात्र खूप*

*लग्ना कार्यात माणसं , नाती*

*व्हायची एकरूप*



*अमावस्येच्या दिवशी पोरं*

*मारुतीच्या पारावर*

*नारळाच्या टूकड्यासाठी*

*एकमेकाच्या अंगावर*



*ओ मामा द्या नं , ओ मामा द्या नं*

*एकच गलका व्हायचा*

*रेटा रेटी  केल्यामुळं*

*सदरा टरकून जायचा*



*पाहुण्याला पाहुणचार म्हणून*

*खिचडी भजे व्हायचे*

*तेवढ्यातच सारयांचे*

*डोळे भरून यायचे*



*तेलच्या-गुळवणी आणि पापडांची*

*काय मामलात होती*

*तरीही त्या माणसां मधे*

*माणुसकी होती*



*रात्र रात्र गप्पा व्हायच्या*

*डोळ्यात यायचं पाणी*

*आडपडदा न ठेवता*

*दुःखाची व्हायची गाणी*



*कुठे गेला तो साधेपणा*

*कुठे गेलं ते सुख  ?*

*खरं सांगा पहिल्या सारखी*

*लागते का आता भूक ?*



*इतकुसाक पेढ्याचा तुकडा*

*मिडकू मिडकू खायचा*

*कधी तरी कुणी तरी*

*प्रसाद म्हणून द्यायचा*



*सारं सारं संपून गेलं*

*आता पैसा बोलत असतो*

*माणूस मात्र भ्रमिष्टा सारखा*

*खोटं खोटं डोलत असतो*



*पेढ्याच्या बाॅक्स कडे*

*ढुंकूनही कुणी पहात नाही*

*एवढंच काय पहिल्या सारख्या*

*मुंग्याही लागत नाही*



*सुखाचं बोट कधी सुटलं*

*आपल्या लक्षात आलं नाही*

*श्रीमंतीत सुख मिळेल वाटलं*

*तसं काही झालं नाहीे*

*ते सुख आणि वैभव*

*पुन्हा घरात येईल का ?*

*चिरेबंदी वाड्या मधून*

*हसण्याचा आवाज येईल का?😌😔😊*
       
*🌳🌳🌳 माझं गाव🌾🌾🌾*

गुरुवार, १७ ऑगस्ट, २०१७

माझे डि.एड. शिक्षण

[17/08, 1:32 PM] 👏🏻: माझा डी.एड. ला प्रवेश


मी सहज उस्मानाबाद जिल्ह्यात पोस्टाने फॉर्म पाठवला.व माझा नंबर डी एड कॉलेज नळदुर्ग येथे लागला.स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित हे कॉलेज कै.बापूजी साळुंखे यांच्या पुण्याईने उभारण्यात आले होते.या कॉलेजमधील पहिला दिवस खुप आठवतो.पहिल्या दिवशी मी वडाच्या झाडाखाली बसलो होतो.तेथे मगतराव बालाजी व काळे गुणवंत यांची ओळख झाली.निसर्गरम्य प्रदुषण मुक्त वातावरण.स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे ब्रीद ज्ञान,विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार हे होते.मी फलकावर दररोज सुविचारांचे लेखन करीत असे.आम्ही सर्वजण गणवेशात जात असु.प्रथम वर्षाचे सुक्ष्म पाठ,सेतु पाठ  व सराव पाठ खुप लक्षात राहिले.सुरुवातीला भीतीने पाय थरथरत असत.आमच्या प्रथम वर्षातील सर्व छात्र अध्यापक खेळीमेळीने दडपणमुक्त रहात असत.प्राचार्य देवकर सर आम्हाला हिंदी विषय शिकवत असत.मला सांगवे सरांच्या तासात खुप हसु येत असे.माझ्या डेस्कजवळीत खिडकीत घुबडाची पिल्ले चिंचेवर बसुन माना हलवत त्यांची मान सांगवेसरांच्या मानेसारखी हलते हे पाहुन खुप हसु येई.सांगवे सर खुप वृद्ध झाले होते.अणदूर जवळचं खुदावाडी हे त्यांचं गाव.
प्रथम वर्षातचं छात्रअध्यापकांना व्हॉलीबॉल खेळण्याचा लळा लागला होता.कोण कत्ता चांगला मारतो ? याची चुरस लागलेली असे.मला व्हॉलीबॉल येत नसे.मला मँच पाहण्यात मजा वाटत असे.प्रथम वर्षापासुन मी अभ्यासाकडे लक्ष देत असे.     ब-याच जणांना अभ्यासाचे गांभीर्य नव्हते.

कॉलेज सुटल्यानंतर मी व जीवन भोसले नियमित वाचनालयात जात असे.मी खोलीवर हाताने स्वयंपाक करीत असे.मी व्यासनगरात शहापुरकर यांच्या वाड्यात रहात असे.तेथेच जीवन भोसले जवळच सोमवंशी ,राठोड शिवाजी व राम माने रहात असे.काही दिवसानंतर कल्याणी व इतर समोरच्या घरात रहायला आले होते .गोविंद सुर्याजी पाटील हा त्यांचे मामा बाबरे सर यांच्या घरी रहात असे.मी व गोविंद पाटील मिळुन कॉलेजला जात असत .कॉलेज रुमपासुन जवळपास दीड ते दोन कि. मी. अंतरावर होते.नळदुर्ग मधील किल्ल्याजवळ भरणारा बाजार खुप आठवतो.त्या वेळी खुप स्वस्ताई होती.नानी मां चा दर्गा खुप पावित्र्याने भरलेला वाटे.मी केंव्हातरी मैलारपूरला सुट्टीच्या दिवशी तसेच किल्ल्यातही जात असे.नळदुर्गचा तो किल्ला मी कित्येक वेळा पाहिला होता.व   ब-हाणपुरला जाऊन आलो होतो.नळदुर्गच्या किल्ला परीसराची भटकंती मी कित्येकवेळा पायीच  केली होती.
बालाघाट कॉलेजजवळील मागासवर्गीय वसतिगृहावर माझा मित्र वायदंडे रहात असे.माझ्या रुमवर तो येत असे.ब-याच जणांना मी एकलकोंडा वाटत असे.मी सर्व प्रात्यक्षिक कार्य पुर्ण करुन चांगले अंतर्गत गुण मिळवलो होतो.मी शहापुरकरांच्या वाड्यात संचार हा पेपर नियमितपणे वाचत असे.वाड्यातील रविवार सुद्धा कामात जात असे.

क्रमश:
[17/08, 1:32 PM] 👏🏻: डि एड कॉलेज १९९७ते ९९

कॉलेजमध्ये पाठाच्या सादरीकरणाचं जास्त गांभीर्य नसे.जसे सिनीयर तसेच ज्युनीयर .विद्यालयात परिपाठ अतिशय चांगला होत असे.रामकृष्ण रहिम ख्रिस्त बुद्ध झरतुष्ट .....या प्रार्थनेने वातावरण मांगल्याने भरुन जात असे.सर्वजण आनंदाने रहात असत.गाव ऐतिहासिक असल्यामुळे काही कमी नसे.एकदा माझ्या रुमवरील रॉकेल संपले होते.तर अंगुले भरत व शशिकांत कुलकर्णी यांनी मला रुमवर आणुन दिले होते.सोमवंशीला मी खुप चिडवत असे.जवळगे श्रीराम हा व्यायामाकडे जास्त लक्ष देत असे.पुजारी श्रीराम मी व्हॉलीबॉल चँपियन आहे या गुंगीत रहात असे.चौगुलेची नजर आकाशाकडे असे.तर देशमाने सिनियर असल्यामुळे सर्वांना समजावुन सांगत असे.मुगळे रवीराज हा नावाप्रमाणे कॉलेजला लवकर न येता उशीरा येत असे.सतत पासची व बसची  चर्चा करीत असे.मुगळे रविराज याचे अभ्यासाकडे लक्ष नसे.कांबळे हा निष्पाप नजरेने पहात असे.राजु लोहारे पारले बिस्कीटची हसुन जाहीरात करीत असे तर माणिकशेट्टी सुनील शेट्टीची स्टाईल मारत असे.मुली मात्र कोणी कितीही चांगली कामगिरी केली तरी कुणालाच भाव देत नसत.प्रत्येकजण आपल्या विश्वात आनंदी होता.लातूरचा माने अन्यायग्रस्त व अभावग्रस्त चेहरा करत असे.वायदंडे दयानंद व ईरले सदाशिव हे दुष्काळग्रस्तांसारखा चेहरा करत असत.मोहन व आबाराव कांबळे मला फिल्म शोलेमधल्या गब्बरसिंग व त्याचे साथीदार यांच्यासारखे दिसत.


ग्रामोपाध्ये सर अध्यापन पद्धतीकडे जास्त लक्ष देत असत.ते गणित का शिकवत नाहीत याबद्दल छात्रअध्यापकाच्या मनात राग असे.घोडके सर मला विज्ञान विषयातील ८४ गुणांचे रेकॉर्ड सांगत.मी ते ८८ गुण घेऊन मोडलो हे सांगण्याकरीता पुन्हा जाणे झाले नाही.पुराणिक कारकुनाचे सर्वांकडे लक्ष असे.अंतर्गत गुणाच्या धमकीला कांही जण घाबरत असत.मला तुळजापुरहून येणा-या शिक्षकांचे नवल वाटत असे.संगीत शिक्षकांच्या सुरात कांही विद्यार्थी वेगळाच सुर लावत असत.कळंत्रे सरांनी आपल्या जीवनाची वाताहात केली होती...जाने कहॉ गये वो दिन हे गीत ते का गात...? का पित असत...? असले नसले प्रश्न मला पडत असत? माझ्या एका प्रिय मित्राला टपरीवर सिगरेट ओढताना पाहिल्यावर माझ्या नैतिक स्वभावाला धक्का बसला होता.


आमचे घरमालक जीवन वाकळे वर सतत लक्ष ठेवत असत? कारण पाणी गरम करताना तो अंडी बॉईलकरत असे.व टरफले समोर टाकत असे.याचा त्याना राग होता.घरमालकाचा डोळा चुकवुन पेरु फस्त करणे हा आमचा उद्योग होता.


क्रमश:
[17/08, 5:00 PM] 👏🏻: डी एड १९९७ ते ९९

कॉलेजमध्ये असताना मला नेहमी मांगल्य व पवित्रता याचा शोध घेण्याची सवय होती.मी अजुनही शाकाहारी व निर्व्यसनी राहिलो याचे श्रेय आजुबाजुला सामान्य जीवन जगणा-या माणसाकडे जाते.माझं इंग्रजी चांगलं होतं.त्याचा फायदा शिक्षकांना व विद्यार्थ्यांना झाला.मी डि.एड ला असताना वेळेवर नियमित जात असे.ती सवय अजुन का़यम आहे.गेल्या १७ वर्षात २ते ३वेळा कांही  अपरिहार्य कारण वगळता मी शाळेत नियमित जाऊ शकलो.
डि.एड ला असताना छात्र अध्यापकावर जसे संस्कार होतात तेच कायम रहातात.जीवनात नेहमी चांगल्या गोष्टीचा शोध घेतल्याने स्वत:चा व इतरांचा विकास होतो.जीवनमुल्ये व संस्कार मुल्ये आत्मसात केल्याने आपणास कोणतेही काम केल्यानंतर अपराधीपणाची भावना रहात नाही.आपले कर्म चांगले असतील तर मन प्रसन्नतेने काम करते अन्यथा कामात मन लागत नाही.वेळ मारुन नेऊन थातुरमातूर  काम केल्यास मन पश्चातापाच्या अग्नीत जळते.व पश्चातापाच्या स्थितीत मन नसेल तर नियती त्याला जबरदस्त शिक्षा देते.मुलांचे आयुष्य बिघडवण्यासारखे दूसरे पाप नाही .डि.एड मध्ये प्रशिक्षण म्हणजे रंगीत तालीम असते.२२ मार्च २००० रोजी मी लातूर जि.प.मध्ये सेवेत रुजु झालो.माझे स्वप्न होते.आपल्या जीवनकालात कमीत कमी दोन विद्यार्थी तरी MBBS झाले पाहिजेत या वर्षी माझे स्वप्न दोन विद्यार्थ्यांनी करुन दाखवले.माझे पाच विद्यार्थी नवोदय प्रवेशासाठी निवड झाली.पैकी तीन शिकले.एक विद्यार्थी MIT पुणे येथे लागला.एक विद्यार्थी नेव्ही मध्ये गेला.सत्य सुंदर मांगल्याची आराधना केल्याने परमेश्वर जवळ असल्याची जाणीव होते.डि.एड चे प्रशिक्षण व वरील सर्व गोष्टीचा मेळ कसा बसतो याचा मी प्रयत्न करतो.तर नवल वाटते.वट वृक्षाचे बी किती सुक्ष्म असते पण त्याचे सामर्थ अचाट असते.


जीवनात जे काही मिळाले ते जवळच्या सर्व गुरु ,मार्गदर्शक ,मित्रांनी  दिले.आपण एका दिव्यत्वाच्या सोबत आहोत.याची जाणीव सतत होते.

क्रमश:

बुधवार, १६ ऑगस्ट, २०१७

[06/08, 4:21 PM] 👏🏻: इतिहासाचा मागोवा



लामजना जि.प.प्रशालेची स्थापना स्वातंत्र्यापुर्वी झाली.या शाळेचा इतिहास पाहता मनात खुप आठवणी दाटुन येतात.आम्ही कालपरवाचे परंतु या शाळेबद्दल पंचक्रोशीत आदराने नाव घेतले जात असे व आताही घेतले जाते.शाळेचा नावलौकीक त्या शाळेतील शिक्षक,अभ्यासु विद्यार्थी ,व जागरुक ग्रामस्थामुळे होतो हे काही वेगळे सांगायला नको.शाळेला चांगले गुरुजन लाभले त्यामुळे संस्था येथे येऊ शकली नाही.काही प्रयत्न वावटळी सारखे झाले असतील.कै.साखरे गुरुजींचे कार्य,गांधीजींचा पुर्णाकृती पुतळा,हनुमान मंदिर,लक्ष्मी व खंडोबाचे मंदिर,बालाजी मंदिर,सरकारी दवाखाना,जुनी मशीद,शेख सुल्तान साहेबांची दर्गा,मारुतीवाडी,भव्य वाडे,गढ्या,जुनी आडं या सारख्या कित्येक भौतिक सांस्कृतिक खुणांनी गावपण भरुन गेलेलं.लोकमान्य क्रीडा मंडळ,माऊली गणेश मंडळ,नवरात्रमहोत्सव,गांधी क्रिकेट क्लब,ग्रामविकास वाचनालय यासारख्या कित्येक मंडळांच्या कार्याची आठवण येते.गावाची समृद्ध बाजारपेठ,गावात वेळेवर येणा-या बसेस,बँका,टेलीफोन ऑफीस,तलाठी सज्जा,ग्रामपंचायत कार्यालय व तेथे मँच पाहण्यासाठी होणारी गर्दी,गावातील अखंड हरिनाम सप्ताह यासारख्या कित्येक गोष्टींनी गावपण कसं भरलेलं असे.सर्वात महत्वाची गोष्ट सर्वांचा एकोपा नजरेत भरण्यासारखा होता.मतभेद,धर्मभेद,जातीभेद याला काही मुळी थारा नव्हता.
दसरा ,रंगपंचमी व पोळा हे सण कायम लक्षात राहिले.गावातील राजकारण हे फक्त निवडणुकीपुरते पुन्हा सर्वजण एकोप्याने रहात असत.गावातील प्रत्येकाची सर्व नागरिकांना ओळख असायची.गावात     येणा-या व कायम रहाणा-याला काही जण पाणी लागलं वाटतं इथलं असं विनोदानं म्हणत असत.



३० सप्टेंबर १९९३ ची भीषण पहाट मला आठवते.मी जागा होतो.पृथ्वीचे ते भीषण रुप पाहुन बोबडीचं वळाली.एका दणक्यात या सा-या ऐतिहासिक खुणांना तडे गेले.गाव मेन रोडवर आले.मग नवीन संस्कृती.नवीन घरे.शेजारी बदलले.गावात कोण नवीन आले कोण गेले फक्त कांहीजणांना समजते.एकमेकांना भेटायचे म्हंटले तर दोन घरात बरेचसे अंतर.जुन्या गावात वर्षभर  पाणी भरपूर मिळायचे.आता ही मिळते परंतु नियमित मिळेल का? याची काही गँरंटी नाही.कारण पाऊस नाही तर नळाला तरी पाणी कोठुन येणार?जुन्या गावात गरजा कमी व प्रश्नही कमी होते.कष्ट करणारे शेतकरी व शेतमजुर यांनी गावाला गावपण आणलं होतं.येथे येणा-या कित्येक राजकारणी ,समाजसुधारक,
शिक्षकांनी वैचारिक बैठक पक्की केली होती.सावळकर साहेबांपासुन ,प्रशासन व इतर अधिकारी, प्राध्यापक, शिक्षक,वकील,इंजिनिअर,पोलीस,वायरमन या पदावर जाण्याची अनेकांना  संधी मिळाली.

इतिहासाच्या पाऊलखुणा पाहने महत्वाचे आहे.कारण नव्या पिढीला काहीतरी शिकायला मिळते.आपण ही जुन्या पाऊलखुणा मांडा!



   संकलन    श्याम गिरी
[06/08, 4:42 PM] 👏🏻: लक्षात राहिलेले शिक्षक


   किल्लारीचे जिडगे सर


लामजना प्रशालेत लक्षात राहिलेले शिक्षक म्हणजे किल्लारीचे जिडगे सर.ते नियमित शाळेत येत असत.स्वच्छ पांढरे धोतर,डोक्यावर गांधी टोपी तसाच सदरा.सर खुप कडक पण तितकेच मायाळु होते.मी पाचवीला होतो सर आम्हाला विज्ञानाचे प्रयोग करुन दाखवत असत.सर पान खात असत पण त्यांना इतरत्र थुंकताना कधी पाहिलेलं नव्हतं.सर कधी आजारी पडत नसत.त्यांची शिकवण्याची पद्धत चांगली होती. सर विज्ञानाचा पाठ शिकवताना चार्टचा वापर करीत असत.सरांना मी तासावर कधीचं लेट आल्याचे पाहिले नव्हते.शाळेतील त्यांचे वर्तन आदर्श होते.त्यांनी पुरस्कारासाठी कधीही फाईल केली नाही.
[06/08, 7:25 PM] 👏🏻: आठवणीतले शिक्षक

श्री वसंत सिताराम टेंकाळे


नाव काढताचं हात आपोआप जोडले जातात असे विज्ञान विषय शिकवणारे कडक शिस्तप्रिय,शांत स्वभाव,प्रचंड अभ्यास ,शांत व संयमी मुर्ती,मनाने तितकेच चांगले व प्रेमळ मुर्ती  डोळ्यासमोर उभी रहाते.तास पडला की पटकन वर्गात पाऊल टाकुन कामाला लागणारे.हातात प्रयोगाचे साहित्य
घेऊन शिस्तबद्धपणे उभे रहात किंवा  हातात भौतिकशास्र,जीवशास्त्र,रसायनशास्र यापैकी एखादे पुस्तक असे.
विषयावर प्रचंड प्रभुत्व असणारे टेकांळे सर दिसले की प्रचंड आदर वाटत असे.सरांना पुस्तक पाठ होते.त्यांच्या अध्यापनामुळे विज्ञाननिष्ठा निर्माण होऊन विद्यार्थी डोळस बनले.पाठ्यपुस्तकातले ज्ञान ते सहजपणे जीवनाशी जोडत असत.मायक्रोस्कोपचा वापर करुन स्पायरोगायरा ही वनस्पती आम्ही पाहिल्याचे आठवते.टेंकाळे सर वैज्ञानिक जाणिवा रुजवण्यासाठी विविध  परीक्षा घेत असत.वाचनाची प्रचंड आवड असणारे टेंकाळे सरांची प्रयोगशाळा सदैव सज्ज असे.विविध भारतीय सणांमागील वैज्ञानिक पार्श्वभूमी सर सांगत असत.सर जानेवारी २०१७ महिन्यात भेटले .प्रकृती अतिशय चांगली दिसली.चेहरा प्रसन्न वाटला.सरांचे जीवन सुखाचे जावो ही ईश चरणी प्रार्थना.


संकलन. श्याम गिरी
[06/08, 10:25 PM] 👏🏻: आठवणीतले शिक्षक
 
  वाघोलीकर सर


विनोदाचा बादशहा ,इंग्रजीवर उत्तम प्रभुत्व असणारे सर म्हणजे वाघोलीकर सर.संपुर्ण बालपण व दहावीचे  शिक्षण लामजना गावात पुर्ण झाल्यावर सरांनी बी.एड केलं व त्यानंतर इंग्रजी विषयाचे माध्यमिक शिक्षक म्हणुन त्यांनी पदभार स्विकारला.त्यांचे वडील गावातचं शिक्षक होते.वाघोलीकर सर खुप वेळा प्रभारी मु.अ.म्हणुन राहिले.प्रशासनाचा सरांना प्रदीर्घ अनुभव होता.सरांचे गावावर निस्सिम प्रेम होते.सरांबरोबर त्यांच्या मँडमही प्रशालेत शिक्षिका  होत्या.

सरांचे अध्यापन उत्कृष्ट होते.इंग्रजी भाषेतल्या कथेचा प्रसंग ते वर्गात उभा करीत असत. त्यांनी शिकवलेली kidnapped कथा अजुनही आठवते.सर मुलांना खुप हसवत असत.पुर्वी शाळेतल्या अध्यापनाची गावात खुप चर्चा केली जात असे.वाघोलीकर सरांचा स्वभाव प्रचंड विनोदी व ते अभिनय उत्तम करायचे.मुले माराच्या भीतीने खुप अभ्यास करत असत.बेस कच्चा असणा-या मुलांना सरांचे इंग्रजी कळत नसे.सरांचे ग्रामरवर प्रभुत्व होते.त्यांना गावात खुप मान होता.


ते शाळेत रात्रअभ्यासिका चालवत असत.गडबड करणा-या ब-याच मुलांना डोक्यावर पेटी देऊन घरी हाकलुन लावत असत.
सर योग करत असत.अजुनही प्रकृती उत्तम आहे.त्यांच्या कार्याला नमन.
[07/08, 3:40 AM] 👏🏻: आठवणीतले शिपाई लांडगे मामा



मोगरगा गावचे लांडगे मामा एक दीर्घ कर्मयोगी माणुस.सतत शाळेत दिसायचे.ब-याच वेळेस शाळेत मुक्कामाला असायचे.लांडगे मामा म्हटलं की डोक्यावर पांढरी टोपी,पांढरा शर्ट,पांढरी पँट असणारा सावळ्या रंगाचा कष्टकरी मुर्ती डोळ्यासमोर
उभी रहाते.वर्गाची स्वच्छता असो की ऑफीसमधले काम असो लांडगे मामा आळस कधी करत नसत.पंधरा ऑगस्टला चुरमुरे देताना त्यांच्या चेहरा खुप मोठा कृतार्थ भाव रहात असे.वाघोलीकर सर त्यांना "लक्ष्मण" नावाने हाक मारत असत.लांडगे मामांना कधी गणवेशात नसताना कधीच पाहु शकलो नाही.त्यांचा तो नियमितपणा मला खुप आवडायचा.लांडगे मामा मुलांचे, शिक्षकांचे मित्र होते.येणा-या पाहुण्यांचे ते हसत मुखाने स्वागत करत असत.त्यांच्या सेवानिवृतीच्या कार्यक्रमास मी हजर होतो.लांडगे मामा या दोन चार वर्षात भेटले नाहीत.मोगरगा गावात रहाणारे लांडगे मामा सदैव स्मरणात राहतील.ईश्वर त्यांना दीर्घ आयुष्य प्रदान करो.
[07/08, 3:53 AM] 👏🏻: आठवणीतले शिक्षक


मोगरग्याचे निकम सर



दीर्घआयुष्य लाभलेले निकम सरांचे वय ८० च्या पुढे आहे.ते लामजना गावात सतत येतात.शरीर पोलादी .मला ते नेहमी सरदार वल्लभभाई पटेलांसारखे पोलादी पुरुष वाटत.शाळेला उशीरा येणा-या मुलांच्या मनात निकम सरांची भीती होती.कांही जणांनी त्यांचा चांगलाच मार खालेल्ला असेल.निकम सर सरळ स्वभावी.अनलंकृत भाषा (अलंकार नसणारी भाषा ) वापरणारे नेहरु शर्ट ,धोतर पायात करकर करकर वाजणारा जोडा घालणारे सर  अजुनही स्मरणात आहेत.कै.जगताप सर,कै.वडवळे सर यांना निकम सरांबाबत खुप आदर वाटते.विद्यार्थाच्या ढोंगी पणावर सर सतत लक्ष ठेवत असत.सर गावात येतात.बँकेत येतात.खुप छान वाटते.त्यांची साधी रहाणी व उच्च विचार सरणी कायम स्मरणात राहिल.सरांना दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
[07/08, 4:08 AM] 👏🏻: आठवणीतले शिक्षक नंदर्गे सर



कसगी कर्नाटक गावचे रहिवासी नंदर्गे सर जॉईन झाले भूंकपापुर्वी दोन वर्ष अगोदर.मी सातवी वर्गात शिकत होतो सर आम्हाला इ.भू.ना विषय शिकवत असत.सर कार्यानुभव विषयाचे शिक्षक होते.परंतु वाघोलीकर सरांनी त्यांना इ.भू.ना विषय शिकवण्यास सांगितले होते.सरांचे इ.भू.ना विषयावर प्रचंड प्रभुत्व होते.खेळ व कवायत हे सरांचे आवडते विषय असत.त्यांचा तो पहाडी आवाज आजही लक्षात आहे.राष्ट्रीय सण व नंदर्गे सरांचा उत्साह प्रचंड असायचा.शाळेतील लाऊडस्पीकर व लाईटींगचे काम सर सहज करत असत.अनेक तांत्रिक विषय त्यांना येत असत.टारगट पोरांना नंदर्गे सरांनी वळण लावले.ध्वज के लिए सलामी दो! हे सरांचे बोल कानात घुमतात.नंदर्गे सर अजुनही सेवेत आहेत.त्यांचा तो उत्साही स्वभाव तिळमात्रही कमी झालेला नाही.सरांच्या कार्याला प्रणाम.
[07/08, 4:14 PM] 👏🏻: लक्षात राहिलेले शिक्षक


कै.मधुकर दत्तात्रय जोशी
गाव गुडसूर ता .उदगीर

असावे घरटे आपुले छान...
या लाडक्या मुलांनो..

यासारख्या कित्येक गाण्यातुन जोशी सरांनी मुलांवर संस्कार केले.जोशी सरांचा आवाज खुप चांगला होता.सर कै.दिगंबर पाटील यांच्या नवीन वाड्यात रहात असत.शेजारी श्री अरविंद शिंदे मामा यांचे दुकान होते.सर कुटुंबापासुन खुप दूर होते.स्वत: हाताने स्वयंपाक करत असत.सरांना सांस्कृतिक कार्यक्रमाची खुप आवड होती.धोतर व सदरा हा त्यांचा साधा वेष.त्यांच्या डोक्यावर मी कधी टोपी पाहिली नाही.जोशी सर खुप प्रेमळ होते.उशीरा येणा-या मुलांच्या तळपायावर छडी मारत.सर संयमी,शांत,वृत्तीचे होते.प्राथमिक वर्गाला शिकवताना ते तन्मय होऊन जात.जोशी सर दोन ते तीन महिन्यानंतर गावाकडे जात असत.त्यांनी मी कधीच आजारी पडल्याचं पाहिलो नाही.सरांच्या खोलीवर मी कधीतरी जात असे.सर या जगात नाहीत असं ऐकलो.स्वातंत्र्य दिना दिवशी त्यांच्या चेह-यावर आनंद ओसांडुन वाहत असे.सर विद्यार्थी प्रिय शिक्षक प्रिय होते.त्यांनी पुरस्कारासाठी कधी फाईल केल्याचे आठवत नाही.सर निर्व्यसनी होते,त्यांच्यासम आम्ही निर्व्यसनी राहिलो.

सरांच्या पवित्र स्मृतीस कोटी कोटी प्रणाम.
[07/08, 4:15 PM] 👏🏻: त्यांना मी कधी आजारी पडल्याचं पाहिलो नाही.

असं वाचा.
[07/08, 4:38 PM] 👏🏻: सुतार सर

आठवणीतले गुरुजी.

मी चौथी वर्गात होतो.वर्गशिक्षक म्हणुन सुतार सरांचे आगमन झाले.सरांमुळे मला पहिल्या बाकड्यावर बसायला मिळे.सुतार सर पाढंरे धोतर,डोक्यावर टोपी,पांढरी टोपी घालत.त्यांच्या रंगाकडे पाहिल्यानंतर पंढरीच्या सावळ्या  विठोबाची आठवण येत असे .सर शेडोळ गावचे रहिवासी.लामजना गावात बहुतेक ८०% शिक्षक रहात असत.सुतार सरांच्या कडक शिस्तीमुळे अभ्यासाकडे वळलो.सुतार सर विषय समजुन देत व त्याचबरोबर फलकावरील मजकुर वाचायला लावत असत.मी सुतार सरांमुळे चांगल्या प्रकारे वाचायला शिकलो.माझे हस्ताक्षरही हळूहळू सुधारले.सुतार सर आले नसते तर चौथीच्या वर्गात प्रथम येऊ शकलो नसतो.सरांजवळ फक्त गुणवत्तेला किंमत होती.कधीच अभ्यास न करणारी मुले त्यांच्या मुळेच तर अभ्यासाला लागली.सरांना सेवानिवृत्ती पुर्वी डायबिटीझचा त्रास जाणवु लागला होता.सर कर्मयोगी होते.मेहनतीनेच सर्व कांही मिळते.जगताप सरांना प्रेमाने सावकार म्हणत असत.
[07/08, 4:57 PM] 👏🏻: लांडगे मामाचे भूत





मगर सर गावात आले आणि सर्वजण  व्यायामाला लागलो.मी पहाटे लवकर उठुन शाळेत व्यायाम करायला जात असे.     ब-याच मुलांना हे जमेनासे झाले.कारण व्यायाम ही संकल्पना आमच्या दृष्टीने नवीन होती.कोणीतरी शाळेत भूत असल्याचे सांगितले.मोठ्या चिंचेजवळ भूत रात्री फिरते असे कानावर आले.कोणीतरी लांडगे मामाचे भूत असल्याचे सांगितले.मग माझ्या मनात प्रचंड उत्सुकता निर्माण झाली.मी पहाटे चार वाजता निघालो.पहातो तर भल्या पहाटे अंधारात पांढरे कपडे घातलेली व्यक्ती फिरत होती.ती बरोबर चिंचेच्या झाडाजवळ होती.माझी घाबरगुंडी उडाली.तरी सुद्धा मी जवळ गेलो.मी म्हटलो कोण आहे? ती व्यक्ती काहीच बोलली नाही.मी आणखी जवळ गेलो.मी म्हणालो,"कोण लांडगे मामा का?" ती व्यक्ती म्हणाली ,"हो मीच!"मी म्हणालो ,"इथं लांडगे मामाचं भूत फिरतय मला बघायचं आहे." त्यावर लांडगे मामा म्हणाले," बघा हो ते दहावीचे पोरं मला भूत म्हणलाल्यात ,गावात काय बी सांगत फिरत्यात."मला मात्र हसु आवरलं नाही.
[07/08, 9:33 PM] 👏🏻: आठवणीतले शिक्षक


कै.विठ्ठल काशिनाथ जगताप

मी एकदा वाचनालयात गेलो पेपर वाचल्यानंतर रजीस्टर मध्ये स्वाक्षरी केली.रजीस्टर मधील पाने चाळताना मला जगताप सरांची स्वाक्षरी दिसली .मी चौकशी केली तेंव्हा सर येथे येत नसतात कोणीतरी दुस-याच व्यक्तीने त्यांची हुबेहुब सही केली होती मी ही अचंबित झालो.√''''''''''' त्यांच्या आडनावाची सुरुवात J ह्या इंग्रजी  अक्षराने होते .जगताप  सरांनी गणितातील वर्गमुळच्या चिन्हाचा व कँपिटल J अक्षराचा स्वाक्षरीमध्ये  सुंदर मिलाफ घातला होता.


जगताप सर गणित व भूमिती विषय शिकवत असत.आज ही त्यांनी शिकवलेले प्रमेय लक्षात आहेत. त्यांचे विषयावरील प्रभुत्व अचाट होते.अतिशय शिस्तीत फलकावर भौमितीक आकृत्या कंपास पेटीच्या सहाय्याने काढत असत.जगताप सरांचे संकल्पना ज्ञान पक्के होते.बीजगणितातील उदाहरणे फलकावर समजावुन देऊन मुलांचा सराव सर घ्यायचे.सर मितभाषी,स्पष्ट वक्ते होते.कमी बोला व अधिक वाचा.हे सुत्र सर मुलांना वहीत लिहायला सांगत असत.गृहपाठावर Good मिळवण्यासाठी मुले स्पर्धा करत.एखाद्याचा सदगुण व दुर्गूण सर समोर सांगत.हाफ शर्ट व पँट हा त्यांचा आवडता पोशाख .सर नियमितपणे तासावर जात असत.कुणाची निंदा व टवाळी यापासुन सर दूर रहात.सरांनी पहिले वाहन M 80 घेतली होती.सेवानिवृत्ती पुर्वी एक वर्ष अगोदर सरांनी पांढरी टाटा कार घेतली होती.त्यांचे गाव उत्का होते.परंतु सर लामजन्यात रहात असत.सर म्हणत मी केलेल्या कष्टाचं चीज झालं म्हणुन लामजनापाटी येथे असलेल्या कापड दुकानाचे नाव मी  'श्रमसाफल्य' ठेवलं आहे.तुम्ही सुद्धा कष्ट करा.असा त्यांचा कानमंत्र होता.सर सेवानिवृत्त झाले कांही महिन्यातचं त्यांचं अकाली निधन झालं.

मी एकदा दीपावलीचा पगारीचा चेक घेऊन कारकुन पठाण सोबत सरांच्या घरी गेलो होतो.सर मळ्यात गेले होते.मग आम्ही मळ्यात गेलो.सर ऊसाला पाणी देत होते.मी सरांना हाक दिली.सर आले व म्हणाले "अरे ,गिरी तू माझी सही केलास तर चालले असते की ,कशाला बेजार झालास ."

एकदा सर मला म्हणाले ,"तुम्ही कोरे बॉंड पेपर घेऊन या व माझ्या सह्या घ्या."सरांचा आपल्या विद्यार्थ्यावर खुप विश्वास होता.सर अजातशत्रु स्वभावाचे होते.

सरांच्या पवित्र स्मृतीस कोटी कोटी प्रणाम.
[08/08, 4:02 AM] 👏🏻: आठवणीतले शिक्षक

वडवळे सर



"मी सकाळी सात वाजता ग्राऊंडवर असतो;कुणाला कांही प्रश्न असतील तर विचारत चला."
अस वडवळे सर म्हणत.ते ग्राउंडवर आहेत की नाहीत हे पहाण्यासाठी मी जात असे. असत.वडवळे सर पर्यवेक्षक होते.बीजगणित व भूमिती हा विषय शिकवायचे.प्रत्येक शिक्षकाला रुजु करुन कार्यान्वित करणे हा वाघोलीकर सरांचा स्वभाव होता.सरमान्यता हीच संचमान्यता होती.त्यांच्या काळात ४० ते ५० शिक्षक कार्यरत असल्याचे मी पाहिले होते.वडवळे सर राठोडा गावचे.शिकवताना खुप तन्मय व्हायचे.खुर्चीवर बसल्यानंतर त्यांचा  उजवा पाय  थरथर कापत असे.आम्हा मुलांना त्यांचे खुप हसू येई.वडवळे सर उशीरा आलेल्या मुलांना कोपरावर वाळुत चालवायला लावत असत.पांढरा शुभ्र सदरा व धोतर हा त्यांचा पोशाख.वडवळे सर कधी आजारी पडत नसत.वडवळे सर कर्मयोगी शिक्षक होते.ते शिस्तप्रिय शिक्षक होते.ते मुलांमध्ये सतत रमलेले असत.सर आता जगात नाहीत.त्यांच्या पावन स्मृतीस कोटी कोटी प्रणाम.
[08/08, 4:19 AM] 👏🏻: आठवणीतले शिक्षक



बाबुराव मुळजे सर


गळ्या शपथ हो! माईचान खरं सांगतो! पाप! .हे डायलॉग त्यांच्या तोंडात सतत असत.बाबुराव मुळजे हे क्रीडा शिक्षक होते.सांगवी( को.) हे त्यांचे गाव.सर शांत ,मनमिळावु,संयमी शिक्षक होते.सरांचा तास केंव्हा येतो हे आम्ही आतुरतेनं वाट पहात असु.सर उत्कृष्टरित्या कवायत घेत असत.कदम ताल शुरु कर.बाए मुड ,दाहिने मुड.हे शब्द अजुनही आठवतात.सर खुप उत्साही होते.त्यांचा एक नावलौकिक होता.त्यांचा मुलगा धनराज उत्तम कवायत करत असे.सरांमुळे मला खो- खो या खेळाचा परिचय झाला.त्यांच्या काळात मुलांना व्यायाम व खेळाचा परिचय झाला.चिंचेच्या झाडाखाली थांबलेली ती सावळी मुर्ती मला अजुनही आठवते.स्वातंत्र्य दिनादिवशी ते मैदान आखत असत.सर वृक्षप्रेमी होते.ते गंगाधर मुळजे सरांचे सोयरे असतील असं मला आडनाव साधर्म्यावरुन वाटत असे.स्वामी सर त्यांना बाबुराव या नावाने हाक मारत असत.सरांचा साधेपणा व गरीब स्वभाव खुप लक्षात राहिला.





सरांच्या पावन स्मृतीस कोटी कोटी वंदन..


संकलन गिरी एस.जी
[08/08, 4:38 AM] 👏🏻: लक्षात राहिलेले शिक्षक



बोधले सर लांबोटा






गावातील शिक्षक संमद खजुरे यांचा वाडा शिक्षकाने सदैव भरलेला असे.त्यांच्या वाड्यात आम्ही किरायाने रहात असु.तिथेच बोधले सर रहात असत.त्यांच्या मंडळी १६ सोमवार व्रत करत असत.बोधले सर भूकंपापुर्वी जुन्या गावात शिक्षक होते.मुले कोणाचही का ऐकत नसतात याची एक कथा ते मनोरंजकपणे सांगत असत.बोधले सर मराठी विषय शिकवत.ते शांत,संयमी होते.त्यांनी कुणाला मारल्याचे आठवत नाही.सर नियमितपणे तासावर येत असत.त्यांचा तो निर्वीकार चेहरा मला अजुनही तुकारामांच्या, चित्ती असु द्यावे समाधान! या श्लोकाची आठवण येते.बोधले सरांच्या नावातचं बोध     हा शब्द होता.बोध (ज्ञान) ले (घे) असं मिश्किलपणे ते सुचवत असत.मी चुकीचे उत्तर सांगितल्यावर सर हसत असत.त्यांचे ते हसणे जिवाला लागायचे व अभ्यासात सुधारणा असे.

बोधले सरांची प्रकृती चांगली आहे.सेवा चांगली केल्याचा कृतार्थ भाव त्यांच्या चेह-यावर दिसतो.



कृतार्थ मी .कृतज्ञ मी.🌷🙏🏻
[08/08, 5:01 AM] 👏🏻: आठवणीतले शिक्षक





खरोश्याचे स्वामी सर







मी पाचवी वर्गात होतो.सर आमचे क्लास टीचर होते.

ABCDEFG Come on Meena read with me...

या गाण्यातुन मला इंग्रजी विषयाची अवीट गोडी लागली.त्यांच्यामुळेच तर मी स्पेशल बी.ए.सहा पेपर इंग्रजी विषय घेऊन करु शकलो.स्वामी सरांचा नियमित तीन वर्षे सहवास लाभला.मी सातवीला आल्यावर इंग्रजी उत्तमरित्या वाचु लागलो.निबंधलेखन करु शकलो.स्वामी सर खरोश्याहून बरेच वर्ष नियमित चालत येत असत.नंतर ते सायकलवर येऊ लागले.स्वामी सर प्रेमळ होते.सरांचे हस्ताक्षर अप्रतिम होते.स्वामी सरांच्या नियमित अध्यापनामुळे इंग्रजी विषयाची गोडी वाढली नंतर कधीच भीती वाटली नाही.गाडीवरुन पडल्यामुळे सरांचा पाय मोडला होता.याचे मला खुप वाईट वाटत असे.सर्व स्टाफ सोबत त्यांचे वर्तन प्रेमाचे होते.सर मत्सरापासून कोसो दूर होते.ते पेटी उत्तम वाजवत असत.गायन उत्कृष्टपणे करत असत.त्यांनी गाईलेले  बलसागर भारत व शारदे   वंदन तुला ही गीते आठवतात.प्रसिद्ध लेखक यदुनाथ थत्ते यांनी शाळेला भेट दिली त्यावेळचा प्रसंगात स्वामी सर आठवतात.




शिक्षक वयानं वृद्ध झाला तरी ज्ञानानं तरुण असतो.याची आज ही प्रचिती स्वामी सरांना भेटल्यावर येते.
[08/08, 6:06 AM] 👏🏻: आठवणीतले शिक्षक





श्री बाबुराव मडोळे ( परीट सर)




करील मनोरंजन जो मुलांचे
जडेल नाते प्रभुशी तयाचे!

या साने गुरुजींच्या वचनानुसार दिसणारे सर म्हणजे परीट सर.परीट सर डोक्यावर गांधी टोपी,पांढरा नेहरु शर्ट व पांढरी पँट घालत असत.सर साने गुरुजींचे प्रतिरुप.मुलांनी उत्कृष्ट काम करताच ते मुलांना खांद्यावर घेत असत.खरा तो एकचि धर्म ! जगाला प्रेम अर्पावे ! ,या लाडक्या मुलांनो तुम्ही मला आधार, बलसागर भारत होवो हीवगीते सर शाळेत सतत गात असत.मुलांना ज्ञानाबरोबर संस्काराचे बाळकडु सरांनी पाजले.त्यांच्या हातातुन घडलेली मुले सर्वाधिक संख्येने शिक्षक झाले.सर एका मला विद्यापीठासारखे दिसत होते. सोज्वळ प्रसन्न हसरा चेहरा.त्यांचे ते विनोद झाल्यावर खळाळुन हसणे.सरांचा चेहरा तणावमुक्त होता.सर विनोदी स्वभावाचे होते.सर मुलांकडुन पसायदान पाठ करुन घेत असत.पाढे पाठांतरावर भर देत असत.सुबक हस्ताक्षराकडे मुलांना वळवत असत.



ग्रामस्थांचा गुरुजींवर प्रचंड विश्वास होता.मोकळेपणा हा त्यांचा स्वभावविशेष होता.त्यांचा मुलगा निलमकुमार मडोळे हे ही प्रशालेत शिक्षक म्हणुन आले होते.सरांचा तो स्पष्ट आवाज अजुनही कानात घमतो...




ध्यास एक साधका ,
अंतरात ठेव तू,
जाण यत्न देव तू....


सर योगा शिकवतात.प्रकृती उत्तम आहे.किल्लारीत रहातात.सामाजिक कार्य करतात.सरांच्या चरणी साष्टांग दंडवत...🌷👏🏻
[08/08, 8:24 PM] 👏🏻: आठवणीतले शिक्षक


निगडीकर सर





हिंदी विषयाची अवीट गोडी लावणारे निगडीकर सर एक अजब रसायन होते.निगडीकर सरांच्या चेह-यावर विद्वता ओसांडुन वहात असे.निगडीकर सर पाठ शिकवताना मन रमुन जायचे.तास केंव्हा संपला हे समजायचे नाही.निगडीकर सर वाघोलीकर सरांचे पाहुणे होते असं ऐकलो होतो.निगडीकर सरांच्या पिळदार मिशा पाहुन भीती वाटत असे.काळा चष्मा ,चेह-यावर मिश्किल हसु दिसत असे.सर हसताना गालावर खळी पडे.निगडीकर सरांच्या शब्दांच्या जादूने विद्यार्थ्यांना अभ्यासाचा छंद लागला होता.




निगडीकर सरांची पुन्हा भेट होऊन शकली नाही.





जिंदगी के सफर गुजर जाते हैं मकाम ओ फिर नहीं आते...
[08/08, 8:41 PM] 👏🏻: आठवणीतले शिक्षक




बिडवे सर




सर आले पळा पळा....

एक काळ असा होता.कोणीतरी सहज म्हंटलं की बिडवे सर आले -या बाबो..पळा रे..पळा रे...असं म्हणत मुलं सापडलं त्या दिशेनं पळत सुटायचे.भीतीनं त्यांचा थरकाप होत असे.मी मुद्दाम सर आले रे म्हणत पळत सुटत असे.कारण दुस-या दिवशी बिडवे सर चांगली हजेरी घेत.बिडवे सरांचं नाव घेताचं मुलांची बोबडी वळत असे.बिडवे सर कडक शिस्तीचे होते.शाळेत बिडवे सर आहेत म्हटल्यावर विद्यार्थ्यी चिडीचुप असत.बिडवे सर धार्मिक होते.पोथीचा अर्थ सांगत असत.गावात सर्वत्र त्यांना खुप मान होता.बिडवे सरांनी टारगट पोरांना वेळोवेळी सरळ केलेलं होतं.



लामजना प्रशालेतील शिक्षकांमुळे मुलांची आयुष्ये बनली.   कित्येकांना नौक-या लागल्या.प्रशालेत माणुसकीचे शिक्षण मिळाले.प्रशाला ही संपुर्ण मराठवाड्यात नावारुपास आली.


बिडवे सरांचं गाव मुरुड( अकोला)
[11/08, 1:04 PM] 👏🏻: आदर्श गावकरी

होतकरु नागरिक


श्री सुग्रीव हरिदास सगर...







घरची परिस्थिती नाजुक,शिकण्याची प्रचंड आवड,मितभाषी ,मनमिळावु स्वभाव,कष्ट करण्याची वृत्ती व चिकाटी असणारा धडपड्या माणुस म्हणजे श्री सुग्रीव हरिदास सगर.या तरुणाचा होतकरुपणा पाहुन रामप्रसाद बजाज भाऊ यांनी त्यांच्याकडे वाचनालयाची जबाबदारी दिली.बरीच वर्षे ते सायकलवर पेपर वाटत असत.त्यांच्या या कष्टाळु स्वभावाचे फळ त्यांना मिळाले गावच्या पोस्ट ऑफीस मध्ये ब्रँच पोस्ट मास्तर म्हणुन नौकरी लागली.सतत कामाचा व्याप लोकांना बचतीची सवय त्यांनी लावली.अनेक वेळा डाक जीवन विमा  कलेक्शन योगदानामुळे त्यांना उत्कृष्ट कार्याचा पुरस्कार मिळाला.मी त्यांच्याकडुन वक्तशीरपणा व कोणाचेही काम पेंडींग न ठेवणे हे गुण शिकलो.अजुनही त्यांचे कार्य सतत चालु आहे.उत्कृष्ट रेकॉर्ड व अचुकता हा त्यांचा हातखंडा आहे.त्यांच्या कार्याला प्रणाम.



संकलन श्याम गिरी
[11/08, 3:59 PM] 👏🏻: आदर्श नागरिक



श्री विठठ्ल (आण्णा) बिराजदार










गावातील प्रत्येक माणसाची बारीकसारीक माहिती असणारा व्यक्ती म्हणज श्री विठ्ठल आण्णा बिराजदार.विठ्ठल आण्णा गेली चाळीस वर्षे ग्रामपंचायत कार्यालयात काम करतात.विठ्ठल आण्णा मनमिळावु,मिश्किल व नर्म विनोद करणारे म्हणुन प्रसिद्ध.पांढरा शर्ट ,तशीच पँट ,व डोक्यावर गांधी टोपी घालत असत.विठ्ठल आण्णा नेहमी प्रसन्न दिसतात.गावातील अनेक त्यांचे  मित्र आण्णाभोवती दिसतात.गावातील अनेक समस्या अण्णांनी चुटकीसरशी सोडवल्या असतील.ग्रामपंचायत मध्ये मुला़ंना क्रिकेट दाखवणारे आण्णा आठवतात.विठ्ठल आण्णांना काही लोक प्रेमाने गांधी म्हणताना दिसत.विठ्ठल आण्णा ग्रामपंचायत मध्ये अजुनही कार्यरत आहेत.आण्णांचा सल्ला बरेच जण ऐकताना दिसतात.ग्रामपंचायत मध्ये आण्णा दिसतातच.ग्रामपंचायत मध्ये गेल्यावर आण्णा हसुन स्वागत करतात.




संकलन श्याम गिरी
[11/08, 7:09 PM] 👏🏻: आठवणीतले शिक्षक


मगर सर



मगर सर भुकंपापुर्वी आलेले शिक्षक मला ते खुप आदरणीय वाटत.ते मुलांना भल्या पहाटे शाळेत बोलवत असत.सर सुंदर योगासने करत.सरांमुळेच मी व्यायामाकडे वळलो.सर निर्व्यसनी होते.सरांना मी कधीही  आजारी पडल्याचे पाहिले नाही.सर खुप लवकर उठत असत  याचेच मला खुप नवल वाटायचे.सर शरीराचा गाडा करुन फरशीवरुन वेगाने जात असत.योगामुळे सर प्रसन्न व तेजस्वी दिसत. इतिहास कधीही नष्ट होत नाही.तो कोठेतरी दडलेला असतो.त्याचा मागोवा घेतल्याने भविष्याचा अचूक वेध घेता येतो.भविष्यात पुन्हा सावरता येते इतिहासामुळेे.
मगर सरांमुळे आम्हाला व्यायामाची गोडी निर्माण झाली.येडशी रामलिंग हे  त्यांचे गाव.


मगर सरांना मनापासुन कोटी कोटी प्रणाम💐


संकलन श्याम गुमानगिर गिरी
[11/08, 7:23 PM] 👏🏻: आठवणीतले शिक्षक


कै.गाडे सर ( तपसे चिंचोली)



माझ्या हि-यांनो व हिरकणींनो असं म्हणुन पाठाची सुरुवात करणारे गाडे सर खुप आठवतात.त्यांचे आडनाव गाढे असेल असं वाटायचं.कारण सर खुप अभ्यासु होते.पांढरा सदरा,तसेच धोतर व डोक्यावर गांधी टोपी घालणारे गाडे सर सायकलवर येत असत.मुलांना पाहताच त्यांच्या चेह-यावर आनंद ओसंडून वाहत असे.गाडे सर मुलांना इ.भू.ना विषय शिकवत असत.सर शैक्षणिक साहित्य चार्ट,नकाशा वापरुन अध्यापन करत असत.गाडे सर पाठ शिकवतांना खुप तन्मय होऊन जात.गाडे सरांवर हिटलरचा प्रभाव होता म्हणुन ते त्याच्यासारख्या मिशा कट करत असत.त्यांचा तो चेहरा पाहुन खुप हसु येई.गाडे सर विद्यार्थीप्रिय शिक्षक होते.त्यांना मी कधीच रागात आल्याचं पाहिलो नाही.जसा शिक्षक तसे विद्यार्थी गाडे सरांमुळे शांत व स्थिर व विचारी झालो.गाडे सरांच्या कानावर केस होते.याचे मला खुप नवल वाटे.


गाडे सर या जगात नाहीत.पण मी त्यांची आठवण काढतोय.हे त्यांना कदाचित समजले असेल.


त्यांच्या पुण्य स्मृतीस कोटी कोटी प्रणाम.💐💐
[11/08, 8:39 PM] 👏🏻: आठवणीतले शिक्षक



श्री बंडू गुरुजी ( अंबुरे सर)



जुन्या पिढीतील साधी रहाणी व उच्च विचार असणारे शिक्षक म्हणजे बंडु गुरुजी.पांढरा सदरा,तशीच टोपी,व पांढरी पँट घालणारे लामजना गावातील बंडु सर दूसरी"ब" वर्गाचे वर्गशिक्षक होते.गावातील कांबळे सर रजेवर गेल्यावर सर आम्हाला शिकवण्याकरिता येत असत."गप्प बसा रे आता. अभ्यास करा बरं !नाहीतर पाठीचं भद्द करीन एकेकाच्या.बाल्या आता तू थंड बसतूस का येऊ तिथं" सरांचे हे शब्द अजुनही कानावर घुमतात.बंडु गुरुजी मुलांना भींतीवर वस्तुसारखं उचलुन धरत असत.कोंबड्याचा आवाज काढत असत.बंडु गुरुजी मुलांचे आवडते शिक्षक होते.सर प्रमोषन होऊन निलंगा तालुक्यात बरेच वर्ष होते.मला प्रेमाने बोलत असत.सर आता खुप थकलेत.आजारी असतात.सरांचा तो शांत,संयमी,गरीब स्वभाव मुलांना खुप आवडायचा.सर आल्यावर मुलांना खुप आनंद होत असे.सर प्रत्येक मुलाची चौकशी करत असत.


सरांना दीर्घायुष्य लाभो.हीच प्रार्थना.
[11/08, 8:55 PM] 👏🏻: आठवणीतले शिक्षक




श्री शेषेराव शिंदे गुरुजी







गावातील अनेक शिक्षकांपैकी जुन्या पिढीतले शिक्षक म्हणजे श्री शिंदे सर . सर कर्मयोगी म्हणजे फक्त कामावर विश्वास ठेवणारे.सर सायकलचा वापर करत असत.नियमित शेताकडे जाणे ही त्यांची सवय होती अजुनही आहे.सरांचा मुलगा युवराज हा उच्चपदावर कार्यरत आहे.आपले कर्म चांगले असतील तर त्याची फळेही चांगली मिळतात असं सर सांगत असत.सरांच्या घराशेजारी मी रहात असे.त्यांच्या मंडळी काकु खुप माया करत असत.सर खुप कष्ट करत असत.जे कष्टाने मिळते तेच कायम टिकते असं सर सांगत असत.



सर सेवानिवृत्त आहेत गावात असतात.प्रकृति चांगली आहे.सरांच्या कार्यास प्रणाम.💐👏🏻



सरांकडुन श्रमसंस्कृती शिकलो.
[11/08, 9:52 PM] 👏🏻: इतिहासाचा मागोवा


लामजन्याची माती म्हणजे फकीराची पांढर असं म्हटलं जात असे.याचा अर्थ मी असा काढला या मातीत शांतता,सुसंस्कार,स्थिरता,त्याग याचे भांडार आहे.मी व माझे बांधव या मातीत खेळलो याचं मातीने संस्काराचं बळ दिलं.या मातीला ज्ञानेश्वर गिरी माऊली महाराज उत्तरेश्वर पिपंरीकर ,नाशिकचे गहिनीनाथ महाराज व तपोनिधी तापीनाथ महाराजांचा ,हजरत शेख सुल्तान ,संत मक्सुद मामु यांच्या चरणाचा स्पर्श होऊन ती पवित्र झालेली आहे.फकीराची पांढर म्हणजे कष्टक-यांची भूमी.



मराठवाडा व हैद्राबाद मुक्तीसंग्रामात येथील तरुणांनी उडी घेतली होती.कोणाकडे तरी त्याचे पुरावे असतीलचं.हटकरवाडीत(मारुतीवाडीत) हत्ती विकला म्हणुन गाव सोडुन जुन्या गावात वस्ती झाली अशी आख्यायिका आहे.


आपण ज्या गावात सध्या रहातो आहे.इथं दुपारी सुद्धा येण्याची भीती वाटत असे.जुन्या गावातुन लोक दत्तापाटीला ( लामजनापाटी) चालत जात असत.पुर्वी गावच्या भोवताली खुप झाडी होती.जुन्या गावातील तकवा या भागात अजुनही दाट झाडी दिसते.तिथं शाडु मिळत असे मी लहानपणी त्याच्यापासुन गणपती बनवत असे.काही भागाला खटकाळी,लेंडकी,मोरंडी,
माळ अशी नावे गाववाल्याकडुन ऐकायला मिळत असत.मी त्या जागी जात असे व त्यांना अशी नावे का दिली याचा विचार करत असे.लोक मोठमोठ्या वाड्यात व गढीत रहात असत.श्री रामप्रसाद बजाज भाऊ यांचा तो जुना ऐतिहासिक वाडा पाहुन खुप नवल वाटत असे .महेश शर्मा( पापु) यांच्या वाड्यात मी जात असे त्यांच्या वडीलांकडे १०० वर्षाचे पंचांग होते.कै.दिंगबर पाटील यांच्याही घरी मी जात असे त्यांच्या वाड्यात ग्रंथाचे नियमित वाचन होत असे.त्यांच्या वाड्यातील पुर्वजांचे फोटो पाहुन माझे मन हरखुन जात असे.कै.दर्शन पाटील यांनी तसाच वाडा बांधण्याचा प्रयत्न केला. कै.नागनाथाप्पा कलशेट्टी यांच्या तेल घाण्याची घरघर कानावर येत असे.कै.सिद्रामप्पा मुळजे यांचा वाडा प्रशस्त होता.कै.दादाराव गोटे यांच्या वाड्यात पिठाची गिरणी होती.माळ्याच्या मळ्यातील नारळाचे उंचच उंच झाड पाहताना सुर्यामुळे डोळे दीपल्याचे आठवते.

जुन्या गावात एक अख्यायिका आहे.लामजना गावातील शेताजवळ निळकंठेश्वराचे मंदिर होते.त्याची सावली मोगरगा पाटीवर पडत असे.कांहीतरी घडले व लामजन्याचा देव रुसला व किल्लारीत जाऊन बसला.ही आख्यायिका  कोणीतरी सांगितल्याचे व त्याच्या चेह-यावरील हावभाव पाहुन हसु आल्याचे आठवते...




क्रमश:



गांधीजीच्या त्या वट्टयावर शिवराज पाटील चाकुरकर पाऊस आल्यावर सुद्धा हातात छत्री घेऊन भाषण करताना आजही आठवतात.बापुसाहेब काळदाते,कै.विलासराव देशमुख साहेब,दिलीपराव देशमुखयांच्यासारख्या कित्येक नेत्यांनी गावाला भेटी दिल्या होत्या.





गावाला लागुन बांधलेली दगडी शाळा हे माझे सर्वात आवडते ठिकाण.उंच निलगिरी वृक्षांचे कुंपन होते शाळेला.शाळेबद्दल सर्व नागरिकांमध्ये खुप आस्था होती व ती आजही आहे.
[11/08, 11:22 PM] 👏🏻: आदर्श नागरिक







श्री रामप्रसाद बजाज (भाऊ)



जुन्या पिढीतील भाऊ म्हणजे एक  प्रचंड अनुभवी व्यक्तिमत्त्व आहेत. सर्वांनाच भाऊंचा आदर वाटतो.भाऊंच्या हातावर जुने व नवीन हनुमान मंदिर ,पाटीवरील दत्तमंदिर,जुन्या गावातील शाळेचे बांधकाम झालेले आहे.पारमार्थिक ( धार्मिक वृत्ती) असलेले भाऊ गावच्या सरपंच पदावर खुप वर्ष राहिले.गावात प्रथम ते शिक्षक होते जुन्या गावातील मंदिराजवळ शाळेत ते जात असत.भाऊंचा नित्य नियम म्हणजे सकाळी शेताकडे जाणे.दररोज रात्री रोजनिशी लिहिणे.ग्रंथाचे वाचन करणे.वाचनालयाकडे फेरफटका मारणे.गावात भाऊनी वाचनालय आणले.गावातील ब-याच लोकांना बांधकामाबद्दल भाऊंचे मार्गदर्शन लाभले.भाऊ शाळेकडे नियमित जाऊन चौकशी करत असत त्यांना कै. श्रीमंत बिराजदार यासारख्या अनेकांची साथ लाभली.लामजना पाटीवरील दत्तजयंती कार्यक्रमात भाऊ पशुप्रदर्शन व कुस्त्यांची दंगल ठेवुन बक्षीस देत असत.  ब-याच उपक्रमात पंच म्हणुन भाऊ असत.त्यांची वृत्ती धार्मिक असल्यामुळे गावातील अखंड हरिनाम सप्ताहात मुख्य भूमिका बजावत असत.शिस्त व निटनेटकेपणा हा भाऊंचा स्वभावविशेष.जुन्या काळातील सर्व दिग्गज नेते भाऊंना ओळखत असत.जेवण झाल्यावर शतपावली करताना खुप वेळा भाऊ दिसतात.कल्याण या मासिकाचे भाऊ आजीव सभासद असुन त्याचे सर्व वार्षिक व विशेष अंक भाऊकडे पहायला मिळतात.पांढरे स्वच्छ धोतर,तसाच नेहरु शर्ट,व डोक्यावर गांधीटोपी हा भाऊंचा पोशाख.

भाऊ प्राणायाम व योगा करतात.त्यांची पुढील पिढी बिझनेस व शेतीत गुंतली आहे.परंतु जनसेवा हीच ईश्वरसेवा हे ब्रीद पुढे घेऊन जाणारे भाऊंचे व्यक्तिमत्त्व पुढील पिढीला मार्गदर्शक व प्रेरणादायी आहे.त्यांच्या कार्याला प्रणाम💐👏🏻
[12/08, 8:44 PM] 👏🏻: आदर्श नागरिक



कै. शेषेराव ग्यानदेव बिराजदार


पांढरे स्वच्छ तसेच धोतर परीधान करणारे कै.शेषेराव गुरुजी लक्षात राहिले.साधी रहाणी,स्वाभिमानी,गांधीवादी शेषेराव गुरुजी गावच्या सरपंचपदी राहिले.गावात एकोपा रहावा म्हणुन गुरुजी खुप झटत.त्यांचे मित्र म्हणजे शिवराज पाटील चाकुरकर साहेब.दीपावली व इतर सणाला त्यांचे मित्र भारत सरकार लोगो असलेले शुभेच्छा पत्र पाठवत असत.

जया अंगी मोठेपण
तया यातना कठीण

याप्रमाणे चांगल्या माणसाला यातना सोसाव्या लागतात.गुरुजी कितीही संकटे आली तरी डगमगले नाहीत.राजकारणातुन लोकांचा विकास व्हावा यासाठी लोकप्रतिनिधींनी रात्रंदिवस झटले पाहिजे असं गुरुजी सांगत.गुरुजी रोज वर्तमानपत्र वाचत असत.गुरुजींना पान खाणे आवडायचं.गुरुजी बरीच वर्षे पोस्टमास्तर होते.नंतर सरपंच झाले.गुरुजींना पैसे कमवण्याचे अनेक मार्ग होते.परंतु गुरुजी निर्मोही होते.जनतेच्या पैश्यावर फक्त जनतेचा हक्क असुन आपण जनतेचे सेवक आहोत असं गुरुजी सांगत असत.गुरुजींचे त्यांच्या गणेश या नातुवर खुप प्रेम होते.गुरुजी समाजसेवक व सच्चे देशभक्त होते.नियमित फिरायला जाणे गुरुजींचा आवडती दिनचर्या होती.गुरुजी एल आय सी चे काम पण करत असत.राजकारणात कशाचीच लालुच न ठेवता कसे काम करावे याचे आदर्श उदाहरण म्हणजे गुरुजी.नशीबाला सुख आले काय नि दु:ख आले काय जे प्रारब्धात आहे ते होणारचं यावर गुरुजींची निष्ठा होती.स्वत: कष्ट करुन जीवन जगावे कोणाचे लुबाडु नये याची शिकवण गुरुजींनी दिली.


कै.शेषेराव गुरुजी राजकारणातले संत होते.त्यांच्या पावन स्मृतीस कोटी कोटी प्रणाम.💐👏🏻
[12/08, 9:07 PM] 👏🏻: आठवणीतले शिक्षक


मोरखंडे सर



मोरखंडे सरांचा तो प्रसन्न चेहरा आजही आठवतो.मोरखंडे सर आमच्या गल्लीत रहात असत.मोरखंडे सर कोणता विषय शिकवत हे काही लक्षात राहिले नाही.मी शाळेत असताना जवळपास ४० ते ५० च्या दरम्यान स्टाफ होता.शिक्षकांच्या बदल्यांचं प्रमाणही खुप कमी होतं.शिक्षक फक्त मुलांच्या प्रगती बद्दल चर्चा करत असत. मोरखंडे सरांचा सहवास कमी लाभला.
मोरखंडे सरांची ती सोज्वळ प्रसन्न मुर्ती पाहुन मन हरखुन जायचे.मोरखंडे सरांचे शिस्तीत काम चाले.मुलांना रागावतांना व छड्या मारतांना मी मोरखंडे सरांना कधी पाहिलो नाही.


सर अजुन सेवेत असतील.त्यांचीही आठवण प्रत्येकाला असेलचं.
[12/08, 9:20 PM] 👏🏻: आठवणीतील शिक्षिका

आळंगे मँडम ( माहेर लामजना)




मी पाचवीच्या वर्गात असताना वर्गशिक्षिका आळंगे बई होत्या.दर गुरुवारी वर्गात पूजा होत असे व मुलांना गोड खाऊ मिळत असे.आळंगे बई सर्व मुलांना समान वागणुक देत असत.छडीचा वापर कमी करत असत.मुलांना वाचन ,लेखन देत असत.त्या सर्व मुलांना विषय समजावुन सांगत असत.मायाळूपणा,नियमितपणा,
शांत स्वभाव या गुणांनी बई परीपुर्ण होत्या.

एक शिकलेली स्री शंभर शिक्षकांच्या बरोबरी इतकी असते.बईंच्या संस्कारात आम्ही वाढलो.मनात थोडीही भीती वाटत नसे.शाळा व घर यातले अंतर बईंनी दूर केले.माझ्या वर्गात १००% मुले हजर रहात असत.प्रेम,ज्ञान, व शक्ती यातुन व्यक्तीचा विकास होतो.

पगारासाठी नौकरी करणा-या लोकांसाठी बई आजही आदर्श आहेत.बईंना खुप दीर्घायुष्य लाभो हीच देवाजवळ प्रार्थना.💐👏🏻
[12/08, 9:45 PM] 👏🏻: आठवणीतले शिक्षक



रामराव कांबळे सर (लामजना)


मी तपसे चिंचोली येथील जि.प.शाळेतुन पहिली पास झालो व लामजना येथे दूसरीला प्रवेश घेतला.माझे नाव दूसरी 'अ' वर्गात घातले गेले.कांबळे सर वर्गशिक्षक होते.सरांचा तेंव्हा परिचय झाला.पांढरा नेहरु  शर्ट व पांढरी पँट घालणारे कांबळे सर खुप मनमिळावु होते.मुलांच्या मनावर कसलाही ताण नसे.ताणरहित आम्ही शिकलो.पाटीवर क,का कि,की...कित्येक वेळा काढुन सरांना दाखविणे हे माझे आवडते काम असे.सर अजुन काढु का? हा प्रश्न विचारताचं सर मान डोलावुन होकार देत असत.कांबळे सर मुलांना मारत नसत.कांबळे सर बरीच वर्षे गावात होते.सध्या सेवानिवृत्त झाले आहेत.सरांना अर्धांगवायुचा अँटक आला होता.सर घरीच असतात.माझे मित्र मात्र विसरुन गेले असतील.कांबळे सर स्वभावाने खुप चांगले आहेत.त्यांचे आरोग्य चांगले रहावे म्हणुन ईश्वराजवळ प्रार्थना करतो.
💐👏🏻
[12/08, 10:11 PM] 👏🏻: आठवणीतील सेवक





गोविंदमामा ( जि.प.शाळा सेवक)






नवीन पिढीला गोविंदमामा कोण होते ? हे माहिती नसेल.गोविंदमामाचे घर शाळेजवळ होते.गोविंद मामा शाळेत शिपाई होते.लामजना शाळेच्या घंटीचा एक विशिष्ट आवाज होता.प्रत्येक टोलच्या आवाजावरुन वेळ समजत असे.सकाळी,दूपारी व शाळा सुटल्यानंतर प्रत्येक वेळच्या घंटेच्या आवाजाची लय व गती वेगळी होती.उदा.मधल्या लघु मध्यंतराची बेल लवकर वाजत असे व चौथा तास काही वेळाने लगेचच पडत असे.गोविंद मामाच्या बोटात ती जादू होती.लांडगे मामा व गोविंद मामा आळीपाळीने टोल टाकत असत.त्यांनी कधी उशीरा टोल दिल्याचे आठवत नाही.गावाचा पसारा पहाता गावाच्या संपुर्ण टोकाला घंटेचा आवाज जात असे.

गोविंद मामाच्या चेह-यावर प्रदीर्घ सेवा केल्याचा भाव असे.सुरकुत्या पडलेल्या चेह-यावर झुपकेदार पांढ-या मिशा वद्धत्वाच्या खुणा सांगत असत.गोविंद मामा मुलांना गोष्टी सांगत.त्यांना कुत्रे पाळण्याचा छंद होता.ते काठीचा आधार घेऊन चालत असत.शाळेतील साफ सफाई चांगली ठेवत असत.सर्वांना प्रेमाने बोलत असत.


मरावे परी किर्तीरुपी ऊरावे .
कै.गोविंदमामा जग सोडुन गेले.त्यांनी माणसाने माणसाला माणुसकीप्रमाणे वागायला काही पैसे लागत नाहीत याची आपल्या सहज वागणुकीतुन शिक्षण दिले.प्रेमळ  गोविंदमामा आज आठवतात.


त्यांच्या पावन स्मृतीस कोटी कोटी वंदन💐💐👏🏻
[12/08, 10:42 PM] 👏🏻: आठवणीतले शिक्षक



गुलाबसाहब (लालासाहब)शेख ( सर)








यांचा तर बहुतेक जणांना विसर पडलेला असेल.मी सहाव्या वर्गात असताना शेख सरांचे शाळेत आगमन झालं.शेख सरांचा चेहरा लालसर दिसे.मला नेहमी वाटे त्यांच्या या गुलाबी रंगावरुन त्यांच्या आईने त्यांचे नाव ठेवलेले असे.सरांची मुलगी तबसुम (रुक्साना) अभ्यासात तितकी हुशार नव्हती.सर परीक्षेत तिला हुशार विद्यार्थ्याजवळ बसवत असत.शिक्षकांची मुले हुशार असतात असं मला वाटे परंतु तबसुम याला अपवाद होती.शेख सर हिंदी विषय शिकवल्याचे आठवते.सरांचा सहवास दीर्घ काळ लाभला नाही.शेख सर प्रेमळ होते.पांढ-या पोशाखातली ती प्रसन्न मुर्ती पाहुन मन हरखुन जाते.

सर कुठे आहेत माहित नाही.परंतु खुप आनंदात असतील.इतरांना आनंदी ठेवणा-यांना देव नेहमी सुखात ठेवतो.
[12/08, 11:12 PM] 👏🏻: आठवणीतील शिक्षक


श्री कोळसुरे सर ( चंद्रकांत यशवंतराव)





30 सप्टेंबर १९९३ च्या भूकंपानंतर कोळसुरे सरांचे शाळेत आगमन झाले.गणित विषयात माहिर असणारे कोळसुरे सर प्रदीर्घ सेवेनंतर प्रशालेतुन रीटायर झाले.मी नववीला असताना काही महिने सरांचे मार्गदर्शन लाभले.कोळसुरे सर हाफ शर्ट व पँट घालत असत.   ब-याच जुन्या व नवीन शिक्षकांना सरांचा सहवास लाभला.मूळचे माळेगाव(कल्याणी) निलंगा तालुका हे सरांचे गाव.सर नियमितपणे गणिताचा ज़्यादा वर्ग घेत असत.मनापासुन हसणारे कोळसुरे सर लोकनिंदेला जास्त भीत असत.आपलं काम भलं या विचाराने ते जगताप गुरुजीप्रमाणे गावात जास्त रमले नाही.साधेपणा हा त्यांचा श्रेष्ठ गुण .मितव्यय ( कमी) खर्च करत.पैशाची उगीचच उधळपट्टी करु नये असं सर सांगत असत.सर सुरुवातीला प्राथमिक शिक्षक होते.पदोन्नतीने माध्यमिक शिक्षक म्हणुन लामजना गावात रुजु झाले.सरांना विनाकारण कोणी वाद घातलेले आवडत नसे.शाळेतील शिक्षक सुजाण असतात त्यांना आपली कामे समजतात.प्रत्येकानं स्वत:ची बाजु तरी सुरक्षित ठेवावी असं सर सांगत असत.जि.प.प्रशालेचे प्रभारी मु.अ.म्हणुन सरांनी काम पाहिले.मुलांना शिकवण्याचा सरांना छंद होता.मी प्रशालेत सरांसोबत दहा वर्षे होतो.


सरांच्या दीर्घ अनुभवाचा फायदा सर्व विद्यार्थांना झाला.सेवानिवृतीनंतर सर लातूर शहरात रहातात.





त्यांना दीर्घ आयुष्य लाभो हीच मंगल कामना करतो.💐👏🏻
[13/08, 6:24 AM] 👏🏻: आठवणीतले प्रयोगशाळा सहाय्यक


आतराम डी.बी



जि.प.प्रशाला लामजना येथे भूकंपापुर्वी श्री आतराम डी बी सरांचे आगमन झाले.ते मूळचे नांदेड जिल्ह्याच्या किनवट भागातील आदीवासी भागातुन आलेले.आतराम सर प्रयोगशाळा सांभाळत असत.नंतर सरांना विविध विषयाचे अध्यापन करावे लागले.काही वर्षे त्यांनी लिपिकाचेही काम केले.आतराम सर स्वभावाने शांत मनमिळावु व संयमी होते.अभ्यास न करणा-या मुलांनी सरांचा भरपूर मार खाल्लेला आहे.आतराम सर वेळेवर येत असत.राष्ट्रीय सणाला उत्साही दिसत.सर याच प्रशालेतुन या वर्षी  रिटायर झाले.नवीन व जुन्या पिढीतील सर्व शिक्षकांना आतराम सर ओळखत असत.त्यांना कधी आजारी पडल्याचे पाहिलो नाही.



आतराम सरांना सुदृढ आरोग्य लाभो हीच प्रार्थना.
[13/08, 6:50 AM] 👏🏻: आठवणीतले शिक्षक





संमद खजुरे सर ( लामजना)




संमद सर गावातले शिक्षक .सरांच्या वाड्यात बरेच शिक्षक रहात असत.संमद सर पांढरा सदरा व पँट घालत असत.प्रकृतिने धिप्पाड असलेले सर उपक्रमशिल होते.सरांची बरीच सेवा तांबरवाडी गावात झालेली होती.सर कडक शिस्तीचे होते.सरांचा मुलगा मुजीब प्रथम वकील व नंतर न्यायाधीश झाला.सरांच्या वाड्यात बायोगँस व शौचालय होते.सरांच्या घराचे दार दगडी व भव्य होते.सर कुटुंबाकडे खुप लक्ष देत असत.सरांचा सहवास लाभला.त्यांनी मला कोणता विषय शिकवला नाही.परंतु त्यांच्याकडुन खुप काही शिकलो.बरेच शिक्षक सरांचा सल्ला घेत असत.सरांचा आजारपणामुळे मृत्यु झाला.परमेश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.💐👏🏻
[13/08, 2:25 PM] 👏🏻: रात्रअभ्यासिका




जुन्या पिढीतली मुले शाळेत अभ्यासाला जात असत.वाघोलीकर सर रात्र अभ्यासिका चालवत असत.काही मुले अभ्यास करताना डुलकी काढत व पेंगत असत.एकदा एक मुलगा रात्री शाळेत अभ्यासाला उशीरा गेला.त्याला काही अडचणीमुळे उशीर झाला होता.त्याचे मित्र स्वागताला तयारीत होते.एकाच्या हातात फडा,एकाच्या हातात उशी व एकजण हातात चप्पल घेऊन उभा होता.एक जण लाईटच्या स्वीचजवळ थांबला होता.सर्वजण काहीतरी मोहीमेची तयारी करत होते.मी खिडकीजवळ उभा होतो.काही कळण्याच्या आत लाईट बंद करण्यात आली.सर्वजण त्या मुलावर मारण्यासाठी तुटून पडले.
दुस-या दिवशीपण तोच प्रकार.अभ्यासिकेला उशीरा येणा-याचा असा समाचार घेतला जात असे.एका दिवशी त्या मुलाला बाकड्यावर झोपी गेल्यावर त्याचे हातपाय टारगट मुलांनी सुतळीने बांधले व भूत आलय -या बाबो..असा त्यांनी गोंधळ केलो.त्यांच्या असभ्य वर्तनाबद्दल वाघोलीकर सरांनी डोक्यावर पेटी,सतरंजी देऊन शाळेला एक फेरी मारुन घरी हाकलुन देण्याची कारवाई केली होती.




रात्र अभ्यासिकेतली मुलं पहाटे लवकर उठुन झाडांना पाणी देत असत.दहावी वर्गात थोडा हुडपणा मुलात असतोच.ते वेगवेगळ्या मार्गांनी व्यक्त करत असतात.आजकालची फार कमी मुलं पहाटे उठतात व जी उठतात ती व्यायाम करतील का? हे सांगता येत नाही.आधुनिक काळात पालकांच्या  अपेक्षा खुप  वाढल्या आहेत.खेड्यात मुलांना अभ्यासाचे कमी गांभीर्य आहे.मुलांचे हात काही निर्माण करण्यापेक्षा फक्त लिहिण्यात गुंतलेले दिसतात.बुद्धिमत्ता आहे पण चिंतन कमी आहे.लोकसंख्या वाढीबरोबर प्रत्येकाचे तितकेच प्रॉब्लेम वाढलेले आहेत.कौशल्य नसल्यामुळे बेरोजगारीचे प्रमाणही वाढले आहे.निखळ बालपण जाईल असे खेळ संपलेले आहेत.मोबाईल गेम व क्रिकेट यातच तरुणाईचा वेळ व्यर्थ चाललेला आहे.तरुण मुलांनी आई वडीलांना समोर ठेवुन अभ्यास करावा व त्यांचे स्वप्न पुर्ण करावे.
[15/08, 5:08 PM] 👏🏻: एकांताची शाळा...





मौन अभ्यास...





फलप्राप्ती काय होईल माहिती आहे?






सर्व शास्त्र तेथे चालत येतात..
[16/08, 6:37 PM] 👏🏻: नवे वारे नवे विचार


तरुण मुलामुलींनी पुढील कृती करावी व नवे वारे व नवे विचार रुजवावेत.


१) विकास या एकाच मुद्दयावर एकत्र यावेत .

२) लोकशाही मार्गाने निवडणुका लढवाव्यात.


३) भ्रष्टाचार करणा-यांना घरचा रस्ता दाखवावा.


४) आपल्या कामातुन तरुण मुले काय करु शकतात.हे जगाला दाखवावे


५) गावातील मुख्य समस्यांची यादी करुन त्यावर उपाय करावा.


६) जो काम करत नाही .त्याला पदावर रहाण्याचा हक्क नाही हे लोकशाही मार्गाने सांगावे.


७) गावातील सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता मोहिम राबवावी.


८)सार्वजनिक शौचालय निर्मिती व वापर,वैयक्तिक शौचालयाचा वापर, जनजागरण,स्वच्छता,कच-याची विल्हेवाट,स्पर्धापरीक्षा वर्ग,अभ्यासिका,क्रीडामंडळे,
सांस्कृतीक कार्यक्रम,आरोग्य तपासणी शिबिर,जलपुनर्भरण,
धार्मिक कार्यक्रम राबवावेत.



९)जनतेचा पैसा योग्य कामासाठीच वापरणे.


१०) गरीब व होतकरु मुलामुलींना शैक्षणिक साहित्याची मदत करणे.


११)दारुबंदी व मटकाजुगार बंदी यासाठी प्रयत्न करणे.



१२) व्यसनापासुन दूर रहाण्याकरीता विविध उपक्रम घेणे.


१३) गावातील अभ्यासात कच्च्या मुलांना वाचन व गणित शिकवणे.



१४) विविध उपक्रम राबवुन लोकात एकोपा निर्माण करणे.



१५) विविध क्षेत्रातील गुणवंत लोकांना पुरस्कार देणे.


उदा. आदर्श पालक, गुणवंत मुले,नवीन नौकरी लागणारे,आदर्श नागरीक, आदर्श माता,आदर्श शेतकरी,आदर्श व्यापारी


१६) सामाजिक कार्यकर्त्यांना बोलावुन लोकांना विविध विषयावर प्रबोधन करणे.यातुन लोकांच्या चुकीच्या समजुती दूर होऊन जादूटोणा ,चमत्कार यापासुन लोक दूर जातील.पर्यायाने घरचा पैसा वाचेल.


१७) संपुर्ण गावातील लोकांच्या विमा पॉलीसी काढुन विमा संरक्षण मिळवुन देणे.


१८) गावात रात्री मोटारसायकलवरुन गस्त घालण्यासाठी पथक स्थापन करणे.महिन्यातुन तारखेनुसार एकदा किंवा दोनदा ड्युटी मिळेल अशी जबाबदारी घेणे.



१९) जो अनाथ आहे.किंवा आई किंवा वडील यापैकी एकजण वारले आहेत.शाळकरी मुला मुलींना शैक्षणिक साहित्याची मदत करणे.समाजातील दानशूर व्यक्तीकडुन मदत मिळवुन देणे.



२०) महिन्यातून कमीत कमी दोनदा सामाजिक विषयावर व्याख्यान आयोजित करणे.





२१) तरुणांना उद्योगाचे प्रशिक्षण देण्यासाठी जिल्हा उद्योग मंडळाचे अल्पमुदतीचे रोजगार प्रशिक्षण व उद्योगासाठी मदत बँकेकडुन अर्थसहाय्य मिळवुन देणे.


२२) गावातील सर्व शासकीय कार्यालयांचा ,तेथील निधी व योजनांचा आढावा घेणे.



२३) उदगीर येथील नेत्र संस्थेमार्फत नेत्रतपासणी शिबीर व उपचार यांचे आयोजन करणे.



२४) गावातील बेरोजगार तरुणांना काम मिळुन देण्याचा प्रयत्न करणे.




२५) विविध शासकीय कार्यालयाशी उदा. जि.प.लातूर यांच्याशी संपर्क करुन विविध योजना गावात आणण्यासाठी प्रयत्न करणे.