रविवार, १० डिसेंबर, २०२३

*श्री.कमलाकर रामराव सावंत केंद्रप्रमुख साहेब यांच्या सेवानिवृत्ती निमित्त लेख* 12 फेब्रुवारी 1964 साली सावंत सरांचा जन्म झाला .किल्लारी सरांचे मूळगाव.28 फेब्रुवारी 2022 रोजी सर नियत वयोमानानुसार 58 व्या वर्षी केंद्रप्रमुख पदावरुन सेवानिवृत्त होत आहेत. त्या निमित्ताने गौरव पर लेख लिहिण्याचा मला मोह आवरत नाही.सावंत सर म्हटलं की डोळ्यासमोर सदैव हसतमुख ,प्रसन्न, सहज भाव असणारी मुर्ती दिसते. जवळपास साडे पाच ते सहा फुट उंच व्यक्तिमत्त्व. सावंत सर हाफ सफारी ड्रेस मध्ये खुप छान दिसतात.सरांची कित्येक वर्षापासुन केशरचनेत किरकोळ सुद्धा बदल नाही.सरांकडे सहज पाहिलो तर टापटीपपणा व स्वच्छता ठळक जाणवते.शाळेत किंवा कार्यालयात जाताना त्यांच्या उजव्या खांद्यावर सीसीआरटी ची बॅग हमखास दिसते.लातूर जिल्ह्यातील अनेक शिक्षकांना सरांमुळे दिल्लीतील *सीसीआरटी प्रशिक्षण संस्थेची* ओळख झाली.शासनाच्या खर्चाने अनेक गुरुजींना दिल्ली दर्शनाचा, मोफत पर्यटनाचा,प्रवासाचा आनंद घेता आला.केंद्र स्तरावर दिल्ली दरबारी सीसीआरटी प्रशिक्षणात लातूर हा संख्येने सर्वात जास्त प्रशिक्षीत जिल्हा आहे .सरांचा यात सिंहाचा वाटा.सीसीआरटी प्रशिक्षणाचे चे सर्व रेकॉर्ड सरांकडे आजही पहायला मिळते.एखादा शासकीय कागद कसा सांभाळावा हे सरांकडुन शिकायला मिळते.पहिली वर्गातील छोट्या मुलांपासुन ते दहावीपर्यंतच्या मुलांसाठी काय-काय करता येईल याकडे सरांचे अधिक लक्ष असे.सर सतत बिझी दिसतात.औसा तालुक्यातील लामजना हायस्कुलला सर चित्रकला विषय शिकवत.सर भिंतीवर अतिशय प्रमाणबद्ध असा भारताचा नकाशा काढत.लामजना हायस्कुल मध्ये अजुनही तो नकाशा आहे.सर नकाशात बारकावे दाखवत.सर सहज विनोद निर्माण करुन हसवत.सर पत्रकार पण होते.*नाग देवता हळूहळू खाली सरकतेय* हा त्यांचा लेख खरोसा लेणीवर प्रकाश टाकणारा दैनिक लोकमत मध्ये लिहीलेला अजुनही आठवतो.सर *फोटोग्राफी* पण करतात.आनंदाच्या क्षणांना कॅमेरॅत टिपुन पुन्हा-पुन्हा त्या क्षणांना पहावं व थोडसं हसावं ,रडावं व अंतर्मुख व्हावं हा सरांचा दृष्टीकोन.जो कित्येकांना उशीरा लक्षात येतो. सर हजरजवाबी व चतुरस्त्र व्यक्तिमत्त्व आहेत.सरांचं वक्तृत्व मला खुप आवडतं.त्यांचे शब्द मोत्यासारखे अतिशय सुरेख, लयदार, दमदार ,मिश्किल. ओघवतं भाषण करणारे सर श्रोत्यांची मने सहज जिंकुन त्यांच्या ह्दयात घर करत.सर बोलताना कधीचं अडखळत नाहीत.चेह-यावर आत्मविश्वास व सत्य ओसांडुन वाहते.समोरच्या व्यक्तीला सर आदराने व प्रेमाने बोलतात. कोणतंही नियोजन असो व कार्यक्रम असो त्यात कलात्मकता व सौंदर्य कमी वेळात आणण्यात सरांचा हातखंडा.सरांकडे रचनेमुळे होणारी जबरदस्त सौंदर्य दृष्टी आहे.वक्तशीरपणा व शिस्तीमुळे सर लक्षात राहतात.भारतीय संस्कृती तर सरांचा प्राण त्याला सामाजिकतेची व शैक्षणिकतेची जोड.मला आठवतं सरांनी अनेक मुलांच्या खात्यावर 500-1000 रु.जमा करुन मदत करण्याचा उपक्रम हाती घेतला होता.गरीब होतकरु मुलांची बँकेत खाते काढली होती.त्यांच्या मदती साठी ते मोठ्या शहरात चित्रप्रदर्शन भरवुन निधी मिळवत असत.आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो हे मुल्य सरांमध्ये सातत्याने दिसते.इथल्या मातीवर,माणसांवर सर मनापासुन प्रेम करतात.तुम्ही कोणीही, केंव्हाही व कधीही हाक मारा सर मदतीसाठी सतत तत्पर असतात.कितीही बिझी असु द्या सर तुमच्या फोनला उत्तर देतातचं. एखाद्याने चांगली कृती केली तर सर त्याच्या पाठीवर कौतुकाची शाबासकीची थाप मारायला कधीचं विसरत नाहीत.आदरणीय सीईओ अभिनव गोयल साहेब यांचा BALA उपक्रम अतिशय स्तुत्य व अभिनंदनीय उपक्रम आहे.लातूर जिल्ह्यात अनेक गुरुजींनी बाला उपक्रमात स्वत:ला झोकुन दिलेलं आहे.सावंत सर आम्हा सर्वांचे प्रेरणास्थान व मार्गदर्शक आहेत.सर शाळांना भेटी देऊन या उपक्रमाचा आढावा घेतात.सरांना सतत नाविण्याची ओढ आहे. समोरच्याचे मनभरुन व पोटभरुन कौतुक करावे ते सावंत सरांनीचं.कामाची यशस्वी पुर्तता करणा-याला प्रमाणपत्र देताना सरांच्या चेह-यावर अलौकिक आनंद झळकतो.मला आठवतं सरांनी एकदा एका सीसीआरटीच्या जिल्हा कार्यशाळेत दूस-या भाषेतील बहुतेक आसामी गाणे म्हटले होते.मला ते गाणे इतके आवडले की मी सीसीआरटीची चार प्रशिक्षणे पुर्ण केलो.सर एक चांगले मार्गदर्शक आहेत. सरांना कोणताही प्रश्न विचारा सर सकारात्मक उत्तर देतात, मार्गदर्शन करतात. मला वाटतं कित्येक गुरुजींना सावंत सरांनी अनेक कामात दिलेला तांत्रिक सल्ला नक्कीचं उपयोगी पडला असेल.सर समोरील व्यक्तीचा उत्साह प्रचंड वाढवतात.काम करण्यासाठी प्रेरणा देतात.Very Good म्हणतात.उगीचचं मनात वाटणारी कोणत्याही कामाची क्लिष्टता व अवघडपणा सहज बोलण्याने कमी करतात. समोरचा माणुस तणावमुक्त होऊन आनंदाने काम स्विकारुन पुर्ण करतो.चुका मान्य करुन कामाला लागतो.सरांकडे आढळणारा सर्वात महत्त्वाचा गुण म्हणजे गुणग्राहकता. समोरच्या व्यक्तिच्या, विद्यार्थ्यांच्या, गुरुजींच्या ठिकाणी असणा-या गुणांना ते पारखतात,ओळखतात व त्याचा उपयोग शाळेला, समाजाला कसा होईल हे पाहतात.मला वाटतं,सावंत सर म्हणजे चालतं ,फिरतं *एक विद्यापीठ* आहेत.सरांनी आदरणीय मुख्य कार्यकारी अधिकारी *प्रवीणजी गेडाम* साहेबांच्या सोबत राहुन लातूर जिल्ह्यातील हागणदारी मुक्त गावासाठी व स्वच्छ गाव होण्यासाठी मोठे योगदान दिले आहे. आदरणीय शिक्षण सचिव *नंदकुमार साहेबांनी सावंत सरांची देशातील 40 उत्कृष्ट शिक्षकांमध्ये निवड केली. ज्यांनी आनंददायी शिक्षणावर नाविण्यपुर्ण उपक्रम केले होते त्यांना 14 नोव्हेंबर 1993 साली दिल्लीमध्ये बोलावुन त्यांच्या कार्याचा गौरव केला होता.2018 मध्ये श्री.श्री.श्री. रविशंकर यांनी साम टि.व्ही.वर नदी जलपुनर्भरणाचे,खोलीकरणाचे लाईव्ह सादरीकरण केल्या बद्दल सरांचा जाहिर सत्कार केला होता.डॉ. पुरुषोत्तम भापकर आयुक्त औरंगाबाद यांनी दयानंद सभागृह लातूर येथे *गुणवत्तेचे शिल्लेदार* म्हणुन दिनांक 12/02/2017 रोजी सरांचा सत्कार केला व आपल्या पुस्तकात पान नंबर 111 वर त्याचा उल्लेख केला आहे.*आदरणीय सिईओ दिनकर जगदाळे साहेब व सन्माननीय एस.पी.सिंग साहेबांनी* सरांच्या कार्याचा गौरव केला.सर अनेक पुरस्कारांचे मानकरी आहेत.सरांमध्ये मला एक *थोर कर्मयोगी* दिसतो .त्यांचं लक्ष अत्युत्कृष्ट कर्म पुर्ततेवर होतं फळाची अपेक्षा करायची गरज नाही काम उत्कृष्ट करा हा सरांचा जीवनमंत्र.सरांचे हस्ताक्षरही अतिशय सुरेख आहे.सरांचे निसर्गावर अतिशय प्रेम आहे.छोट्या कुंड्यात रोप लावुन सर त्यांना जीवासारखे जपतात.सरांना चित्रकलेबरोबरचं अनेक कला हस्तगत आहेत.मला वाटतं सरांनी हजारो किलोमीटरचा प्रवास केला आहे.कितीही प्रवास केला तरी दुस-या दिवशी सर मूळ कामाला तत्पर असतात.*सीसीआरटीचे ते DRP जिल्हा साधनव्यक्ती* म्हणुन काम करतात. कोणत्याही कामाचा गर्व नको किंवा श्रेयही नको असं सर सांगतात.सरांमध्ये दूरदृष्टी दिसतेे.मूल शाळेत यावे, शिकावे,टिकावे,यासाठी काय-काय करता येईल याचे अनेक उपक्रम सर सांगतात.नांदुर्गा केंद्रात असतांना सरांनी सातवी व चौथीच्या शिष्यवृत्ती वर्गासाठी *टिम टिचींगचा* प्रयोग केला होता व अनेक मुले शिष्यवृत्तीधारक झाली होती.त्याची पोहोचपावती म्हणुन सरांनी डॉ.विठ्ठल लहाने यांच्या हस्ते गुरुजींचा सत्कार केला होता.उपक्रम शिलता व प्रयोग शिलता सरांच्या नसानसात भिनलेली आहे.सर शाकाहारी व संपुर्ण निर्व्यसनी आहेत.त्यांना कधीही आजारी पडलेलं मी पाहिलं नाही.सरांची आजही प्रकृती चांगली आहे.सेवा निवृत्तीची काहीही व कोणतीही चिन्हे सरांवर दिसत नाहीत.सावंत सर शरीराने व मनाने अजुनही तरुण आहेत.सावंत सर परीस आहेत.सर जिथे हात लावतील ते सोनं झाल्याशिवाय राहणार नाही.सावंत सरांना शिक्षण संचालकांपासुन ते शिक्षणाधिकारी पदापर्यंतचे अनेक अधिकारी ओळखतात.सीसीआरटीचे डायरेक्टर सरांना फोन करतात.सार्वजनिक जीवनात सरांचा लोकसंग्रह प्रचंड मोठा आहे.एका हाकेवर अनेकांना एकत्र आणण्याची ताकद सरांमध्ये आहे.शिक्षकी पेशा मनापासुन स्विकारुन त्यावर ह्रदयापासुन सर प्रेम करतात.शिक्षकांनी जीवनात अधिक उंची गाठावी असं सर सांगतात.सरांना मी कधीही निराश झालेलं पाहिलं नाही.सरांना कामाचा आळस कसा नाही❓हा सतत प्रश्न मला पडत असे.अजातशत्रु व्यक्तिमत्त्व म्हणजे सावंत सर.त्यांच्या नावातील कमळ फुलाची राष्ट्रीयता मला सरांच्या कामात दिसते.सावंत सर दोन -चार केंद्रांची केंद्रप्रमुखांची जबाबदारी सहज एकटे सांभाळतात.*केंद्र प्रमुख कसे असावेत❓तर ते सावंत सरांसारखे आदर्श असावेत* सर केंद्रस्तरावर अनेक बैठका,केंद्रसम्मेंलने, शिक्षणपरिषदा घेऊन शिक्षकांना प्रशिक्षणं देतात.सरांना जसं अनेक रंगाचे रंगज्ञान आहे तसं सर माणसातले रंगही ओळखतात.सरांची स्मरणशक्तीही अफाट आहे.सर 28 फेब्रुवारी रोजी तांत्रिकदृष्ट्या शासकीय सेवेतुन सेवानिवृत्त होत आहे.नक्कीचं त्यांची सेवा निवृत्ती इतरांपेक्षा वेगळी आहे.यापेक्षा दुप्पट उत्साहाने सर वृक्षांसारखं, नदीसारखं सतत कार्यरत राहतील. त्यांच्या सहवासाने अनेकांच्या डोळ्यांत आनंदाश्रु तरळतील.सरांचे कुटुंबाकडेही लक्ष आहे.मला व सर्वांना प्रिय असणारे सावंत साहेब *ख-या अर्थाने नेशन बिल्डर आहेत.* सरांना व त्यांच्या कार्याला मनापासुन प्रणाम करतो. माझ्या मनापासुनच्या प्रेममय शुभकामना हार्दिक सदिच्छा सरांसोबत सतत आहेत.सर मला कधीही हाक मारा. *गिरी श्यामसुरेश गुमानगिरी* माध्यमिक शिक्षक जिल्हा परिषद प्रशाला अंबुलगा(बु.)ता.निलंगा जि.लातूर 9923060128

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा